Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही : शरद पवार

भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटीलसह १०० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • By Aparna
Updated On: Aug 14, 2023 | 10:17 PM
देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही : शरद पवार
Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  भारताचा नकाशा बघितला तर केरळ पासून सुरुवात केल्यानंतर ७० टक्के भागामध्ये भाजपची सत्ता नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशात नक्की परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना दिले.

सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष, व माळशिरस तालुक्यातील भाजपचे नेते रवींद्र पाटील यांनी त्यांच्या १०० समर्थकांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, सध्या देशाचा नकाशा बघितला तर खालून सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचे केरळ राज्य,त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह जवळपास ७० टक्के ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशातील चित्र पूर्ण बदलून नक्की परिवर्तन होणार आहे. या देशाची लोकशाही आम्हा नेत्यांमुळे टिकली नसून सामान्य माणसामुळे टिकली आहे. परिवर्तन करण्याची ताकद या सामान्य माणसाच्या हातात आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण फिरत असताना शेतकरी, कष्टकरी ही सामान्य जनता आपणास भेटून पाठिंबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे या सामान्य माणसांच्या जोरावर परिवर्तन अटळ आहे. सोलापूर जिल्हा हा सुरुवातीपासून काँग्रेस विचाराचा आहे, या जिल्ह्यातून पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवलेंना दोन वेळा उमेदवारी दिल्यानंतर दोन्ही वेळा ते निवडून आले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. नंतरच्या काळात चित्र बदलले. ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो, त्यामुळे या जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. सध्या सोलापूर दौऱ्यावर असताना सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या भेटी घेत असताना त्यांनी स्वतःहून आम्ही आपल्याबरोबर असल्याचे अभिवचन दिले. रवींद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कधी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना ताकद दिली जाईल. रवींद्र पाटील यांनी माझ्या आजोबापासून आम्ही शरद पवार यांच्याबरोबर होतो. अलीकडच्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारली, मात्र भाजपने दलित- सुवर्ण असा वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हे आमच्या लक्षात आल्यानंतर पुरोगामी विचार असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळे पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. बळीराम साठे यांनी पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या प्रवेश कार्यक्रमानंतर पुरंदर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Bjp is not in power in 70 of states sharad pawar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2023 | 10:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.