Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही : शरद पवार

भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटीलसह १०० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • By Aparna
Updated On: Aug 14, 2023 | 10:17 PM
देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही : शरद पवार
Follow Us
Follow Us:

बारामती:  भारताचा नकाशा बघितला तर केरळ पासून सुरुवात केल्यानंतर ७० टक्के भागामध्ये भाजपची सत्ता नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशात नक्की परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना दिले.

सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष, व माळशिरस तालुक्यातील भाजपचे नेते रवींद्र पाटील यांनी त्यांच्या १०० समर्थकांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, सध्या देशाचा नकाशा बघितला तर खालून सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचे केरळ राज्य,त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह जवळपास ७० टक्के ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशातील चित्र पूर्ण बदलून नक्की परिवर्तन होणार आहे. या देशाची लोकशाही आम्हा नेत्यांमुळे टिकली नसून सामान्य माणसामुळे टिकली आहे. परिवर्तन करण्याची ताकद या सामान्य माणसाच्या हातात आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण फिरत असताना शेतकरी, कष्टकरी ही सामान्य जनता आपणास भेटून पाठिंबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे या सामान्य माणसांच्या जोरावर परिवर्तन अटळ आहे. सोलापूर जिल्हा हा सुरुवातीपासून काँग्रेस विचाराचा आहे, या जिल्ह्यातून पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवलेंना दोन वेळा उमेदवारी दिल्यानंतर दोन्ही वेळा ते निवडून आले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. नंतरच्या काळात चित्र बदलले. ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो, त्यामुळे या जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. सध्या सोलापूर दौऱ्यावर असताना सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या भेटी घेत असताना त्यांनी स्वतःहून आम्ही आपल्याबरोबर असल्याचे अभिवचन दिले. रवींद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कधी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना ताकद दिली जाईल. रवींद्र पाटील यांनी माझ्या आजोबापासून आम्ही शरद पवार यांच्याबरोबर होतो. अलीकडच्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारली, मात्र भाजपने दलित- सुवर्ण असा वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, हे आमच्या लक्षात आल्यानंतर पुरोगामी विचार असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळे पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. बळीराम साठे यांनी पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या प्रवेश कार्यक्रमानंतर पुरंदर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Bjp is not in power in 70 of states sharad pawar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2023 | 10:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
1

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन
2

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी
3

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
4

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.