Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काँग्रेसला विदेशातून… ”; भाजप माध्यम प्रमुख के. के. उपाध्याय यांचा आरोप

लाडकी बहिण योजनेसाठी इतर शासकीय योजनांचा निधी रोखण्यात आला आहे, असे आरोप विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, ''हे खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच एकाही योजनाचा निधी वळविण्यात आलेला नाही, हे स्पष्ट केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2024 | 07:55 PM
''खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काँग्रेसला विदेशातून... ''; भाजप माध्यम प्रमुख के. के. उपाध्याय यांचा आरोप

''खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काँग्रेसला विदेशातून... ''; भाजप माध्यम प्रमुख के. के. उपाध्याय यांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हे खोटं निरेटिव्ह सेट केला होता. त्याचा फायदा त्यांना झाला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कांग्रेसला खोटा नेरीटिव्ह सेट करण्यासाठी विदेशातून आर्थिक रसद पुरवली जात आहे, असा गंभीर आरोप भाजप माध्यम विभागाचे प्रमुख के. के. उपाध्याय यांनी आरोप केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कांग्रेसचा खोटा नेरिटिव्ह मतदारांपुढे मांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही उपाध्याय म्हणाले. भाजप माध्यम विभागाचे प्रमुख के. के. उपाध्याय आणि महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवृक्ते केशव उपाध्ये ‘नवभारत’ संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.

के.के. उपाध्याय म्हणाले, ”भारतीय जनता पक्ष हा केडरबेस पक्ष असून, तो वर्षाचे बारा महिने इलेक्शन मोडमध्ये असतो. कारण देशात वर्षाला कुठे ना कुठे निवडणुका असतात. त्यामुळे भाजप कार्यकर्ते तयार असतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी विशेष योजना सुरु केल्या आहेत. त्यात एसटी बस प्रवासामध्ये ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षण आणि लाडकी बहिण योजने चा समावेश आहे. महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असून, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरुन वांदग निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना १०० पेक्षा अधिक तर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ७० जागा मागत आहेत. त्यावर तोडगा कसा काढला जाईल? या प्रश्नावर उपाध्याय म्हणाले, ”भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महायुती म्हणून निवडणकीला सामोर जाईल, यात शंका नाही. प्रत्येक पक्षाने जास्ती-जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे यात काही चुकीचे नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून कोणती-जागा कोण जिंकेल, यावर ती जागा कोणाला मिळेल, हे पक्षाचे प्रमुख ठरवतील. जो निर्णय घेतला जाईल, तो महाराष्ट्र आणि महायुतीच्या हिताचे असेल.” लोकसभा निवडणुकीत कांग्रेसने भाजप पुन्हा सत्तेत आसल्यास संविधान बदलले जाईल, असा खोटा नेरिटिव्ह सेट केला होता. आता ते २० टक्के समुहाला जवळ करुन ८० टक्के हिंदू समाजामध्ये ताटातूट निर्माण करुन जाती-पातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत,अस आरोप के.के. उपाध्याय यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकींना विकासाच्या मुद्यावर आम्ही सामोरे जाणार आहोत. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास पहिल्या अडीच वर्षांत कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. दुसऱ्या अडीच वर्षात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यातील एक असलेल्या पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबईतील कोस्टल रस्ता मार्गी लागला, लाकडी बहिण योजना राबविण्यात आली. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना छोट्या-छोटया कामासाठी पतीकडे पैसे मागण्याची गरज भासत नाही. उद्योगाला चालना मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लाडकी बहिण योजनेसाठी इतर शासकीय योजनांचा निधी रोखण्यात आला आहे, असे आरोप विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, ”हे खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच एकाही योजनाचा निधी वळविण्यात आलेला नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे खोटे आहेत. कोणीही एकाही योजनाचा निधी वळवल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान उपाध्ये यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून विरोधक लाडकी बहीण योजनेवर बोलणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्ष सातत्याने आरक्षणाचे समर्थन केले आहे. मात्र, अमेरीकेत जाऊन राहूल गांधी यांनी आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कारण यापुर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील त्या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहोत. कारण आज जरी आरक्षण संपणार नसले तरी भविष्यात ते विचार करु शकतात, असे के. के. उपाध्याय म्हणाले.

 

 

 

 

Web Title: Bjp media chief upadhayay allegation to receiving foreign funding to congress for set fake narrative in assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 07:55 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.