Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यातील टक्कल पडण्याचं गुढ सापडलं पंजाब-हरियाणात? अर्थशास्त्रज्ञ रणजित सिंह घुमान म्हणाले…

पंजाब आणि हरियाणाच्या गव्हामध्ये सेलेनियम प्रमाण अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोकांमध्ये अचाणक टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. असा दावा डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केला होता.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 27, 2025 | 10:17 PM
बुलढाण्यातील लोकांचं टक्कल पडण्याचं गुढ पंजाब-हरियाणात? अर्थशास्त्रज्ञ रणजित सिंह घुमान म्हणाले...

बुलढाण्यातील लोकांचं टक्कल पडण्याचं गुढ पंजाब-हरियाणात? अर्थशास्त्रज्ञ रणजित सिंह घुमान म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब आणि हरियाणाच्या गव्हामध्ये सेलेनियम प्रमाण अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोकांमध्ये अचाणक टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. असा दावा डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केला होता. मात्र शेतकरी नेते आणि कृषी तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पंजाबला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असं प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक रणजित सिंह घुमान यांनी म्हटलं आहे. पंजाबने हरित क्रांती आणली आणि अनेक दशके देशाला अन्नधान्य पुरवलं आहे. पंजाबमध्ये वापरला जाणारा आणि पिकवलेला गहू संपूर्ण देशात पाठवला जातो. जर यात काही समस्या असती तर त्याचा परिणाम प्रथम पंजाबमधील लोकांवर दिसून आला असता. हे कोणत्याही प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे संशोधन नाही तर केवळ एका व्यक्तीने केलेला दावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले की, हा पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, आमचे केस लांब आणि जाड आहेत. जर असा गहू असता तर आपण सर्वात आधी प्रभावित झालो असतो. आजपर्यंत आपण असे काहीही ऐकले नाही.

खरं तर, बुलढाण्यातील ३०० ग्रामस्थांमध्ये अचानक टक्कल पडल्याचे वृत्त आल्यानंतर महाराष्ट्रातील डॉ. बावस्कर यांनी जानेवारीमध्ये स्वतःहून एक संशोधन केले होते, ज्यावर त्यांनी सुमारे ९२,००० रुपये खर्च केले होते. २५ आणि २६ जानेवारी रोजी त्यांनी बाधित गावांमधून रक्त, मूत्र आणि गव्हाचे नमुने गोळा केले. तथापि, या दाव्याबाबत, शेतकरी संघटना आणि कृषी तज्ञांनी आता डॉ. बावस्कर यांचा सिद्धांत नाकारला आहे आणि तो निराधार आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.

कोरोना महामारीनंतर HMPV विषाणूने डोकं वर काढलेलं असताना महाराष्ट्रातील बुलढाण्यातील गावकऱ्यांचं एका नव्या व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे. अवघ्या तीन दिवसांत टक्कल पडत असून टक्कल बाधित लोकांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे गावातील लोकांची झोप उडाली आहे.

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे. या तालुक्यातील बाधितांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या लोकांना व्हायरसने ग्रासलं आहे. आज बुधवारी परिसरातील काही गावात २५ नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे. या आजाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Web Title: High selenium content in wheat punjab and haryana cause of maharashtra buldhana district villagers increase alopecia totalis dr himmatrao bavaskar claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • buldhana news
  • Health News
  • Wheat flour

संबंधित बातम्या

अतिस्वच्छतेचा ट्रेंड की मानसिक आजार? मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवताना पालकांनी काय करावं ?
1

अतिस्वच्छतेचा ट्रेंड की मानसिक आजार? मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवताना पालकांनी काय करावं ?

Washim News : निकष न पूर्ण करणाऱ्या शाळांवर कारवाई; वाशिममधील २१ शाळांतील ३९ तुकड्या अपात्र
2

Washim News : निकष न पूर्ण करणाऱ्या शाळांवर कारवाई; वाशिममधील २१ शाळांतील ३९ तुकड्या अपात्र

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये
3

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?
4

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.