Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूमिअभिलेखच्या पोर्टलवरून तब्बल 83 गावं गायब, नक्की काय आहे प्रकार?

भूमिअभिलेख कार्यालयातील पोर्टलवरून 83 गावं गायब झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 20, 2025 | 11:17 PM
भूमिअभिलेखच्या पोर्टलवरून तब्बल 83 गावं गायब, नक्की काय आहे प्रकार?

भूमिअभिलेखच्या पोर्टलवरून तब्बल 83 गावं गायब, नक्की काय आहे प्रकार?

Follow Us
Close
Follow Us:

भूमिअभिलेख कार्यालयातील पोर्टलवरून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तब्बल 83 गावांची नावे गायब झाली आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे. गावांची नावे नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत आता कृषी विभागाने आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ‘हत्तीपाय’चे 3026 रुग्ण, कशामुळे होते लागण? काय आहेत लक्षणं?

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. उद्योग नसल्याने या भागातील नागरिक शेती करतात. त्यातही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते. आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा काढतात. त्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारासह अन्य कागदपत्रांची गरज भासत आहे.

भूमिअभिलेख कार्यालयाच्या पोर्टलवर तालुक्यातील 83 गावेच नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सात-बारा ऑनलाइन झाले नाही. आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी अॅग्रीस्टिकमध्ये नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सात-बारा ऑनलाइन करणे आवश्यक आहे. मात्र,पोर्टलवर गावांची नावे नसल्याने सात-बारा ऑनलाइन करायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीकविम्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. त्यामुळेशेतकरी आपल्या सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. पीकविम्याच्या पोर्टलवर जिवती तालुक्यातील रेकॉर्ड अद्ययावत झाले नाही. पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरत असताना स्टेट लैंड रेकॉर्ड पोर्टल एरर असा संदेश येत आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

तांदळाची किंमत वाढणार! बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील तांदळाच्या व्यवसायात तेजी

कृषी विभागाचा पत्रव्यवहार
पीकविमासाठी नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आता आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Chandrapur district jiwati taluka 83 villages disappeared from the bhumi abhilekh portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 11:17 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Latest News
  • chandrapur news

संबंधित बातम्या

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
1

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

Chandrapur Crime: वरोऱ्यात किरकोळ वादातून रक्तरंजित शेवट; मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाची दगडाने हत्या
2

Chandrapur Crime: वरोऱ्यात किरकोळ वादातून रक्तरंजित शेवट; मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाची दगडाने हत्या

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
3

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.