Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या

गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या विभागातील कर्मचाऱ्यांनी आता असहकार आंदोलन पुकारले आहे. मागणी मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 06, 2025 | 03:14 PM
Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या

Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या

Follow Us
Follow Us:
  • ‘जलजीवन’च्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
  • व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून १२०० कर्मचारी बाहेर
  • ३ वर्षापासून ३ महिन्याने एक वेळा पगार
राज्यातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या विभागातील गत २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या १२०० कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. ५) पासून असहकार आंदोलन पुकारले आहे. यामध्ये जिल्हास्तरावरील कर्मचारी आणि तालुकास्तरावरील कर्मचारी हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रथम टप्पा जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील सर्व कर्मचारी शुक्रवारपासून राज्य स्तरावरील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर पडले आहेत. सोमवारपासून काळ्या फीती लावून काम करणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राज्यस्तरीय कृती समितीने दिला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Badlapur Breking: महाविकास आघाडीला मोठा धक्का! ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणारे ७ उमेदवारांचा भाजपला पांठिबा; राजकीय वातावरण तापले

या योजना राबवल्या जातात

केंद्र शासनाचा आणि पंतप्रधान मोदी यांच्या अजेंड्यावर असलेला जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या दोन्ही योजना आहेत. या दोन्ही योजना ग्रामीण भागामध्ये या कर्मचाऱ्यांच्यावतीने राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनमध्ये योजना राबविणे, या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे पाणीपट्टी गोळा करणे, देखभाल दुरुस्तीबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या बैठका घेणे आदी कामे हे कर्मचारी करत असतात. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय, संत गाडगेबाबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सार्वजनीक शौचालय, सांडपाणी घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन तसेच गोबरधन आदी योजना राबविण्यात येतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत लेखी निवेदन सादर केले. यावेळी बंडू हिरवे, प्रकाश उमक, साजीद निजामी, मनोज डांगरे, कृष्णकांत खांनझोडे, तृष्णांत शेंडे, प्रफुल्ल मत्ते, प्रवीण खंडारे, गीतेश गुप्ता, पायल फटिंग, प्रियंका रामटेके, नरेंद्र रामटेके, विशाल जुमळे आदी उपस्थित होते.

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

कर्मचाऱ्यांना शासन प्रशासनाने सोडले वाऱ्यावर

राज्य शासनाला या विभागाने अनेक प्रथम पुरस्कार मिळवून दिले आहेत, आणि याच कर्मचाऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गत ३ वर्षापासून ३ महिन्याने एक वेळा पगार केले जातात, राज्यस्तरीय कृती समितीने वेळो वेळी राज्य स्तरावर प्रधान सचिव यांना निवेदने दिली. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गत २० वर्षापासून या विभागात कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना नोकरीमध्ये १० वर्ष झाले आहेत. त्यांना कायम करण्याबाबत औरंगाबाद मॅट कोर्टाचा निकाल लागलेला असून त्यावरही शासन कोणतीही भूमिका घेत नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Web Title: Jal jeevan and swachh bharat mission employees started non cooperation movement chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Jal Jeevan Mission
  • Marathi News

संबंधित बातम्या

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
1

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
2

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती
3

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या
4

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.