Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Patil: “एका गंगेतल्या डुबकीत ‘त्यांची’ पापं धुतली जाणार नाहीत!”, राजू पाटील यांची एकनाथ शिंदेंवर टीका

कल्याण डोंबिवली, उल्हानसगरच्या नागरीकांना या नदीचे पाणी पिण्यासाठी दिले जाते. नागरीकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी ही नदी आत्ता तरी स्वच्छ करा आणि पुण्य कमावा असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापे धुतली जाणार नाही. अ

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2025 | 03:18 PM
राजू पाटील यांची एकनाथ शिंदेंवर टीका

राजू पाटील यांची एकनाथ शिंदेंवर टीका

Follow Us
Close
Follow Us:

Raju Patil on Eknath Shinde : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळावर एक भाष्य केले आणि देशभरातील नद्यांच्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आला. आत्ता या प्रकरणात मनसे नेते राजू पाटील यांनी वालधूनी नदी प्रदूषणा संदर्भात ट्वीट करीत नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. वालधूनी नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. ही नदी उल्हास नदीला मिळते. कल्याण डोंबिवली, उल्हानसगरच्या नागरीकांना या नदीचे पाणी पिण्यासाठी दिले जाते. नागरीकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी ही नदी आत्ता तरी स्वच्छ करा आणि पुण्य कमावा असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापे धुतली जाणार नाही. अशी टिका ट्वीटद्वारे मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे.

 मराठा आरक्षण मुद्दा पुन्हा पेटणार! जरांगे पाटलांकडून मुंबईवर धडक मोर्चाचा इशारा

उल्हास नदी बारमाही नदी आहे. या नदीच्या पात्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था पाणी उचलतात. ते पाणी शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करुन नागरीकांना पुरविले जाते. मात्र या बारमाही नदीला जाऊन वालधूनी नदी मिळते. वालधूनी नदी ही सगळ्यात जास्त प्रदूषित नदी आहे. वालधूनी नदी प्रदूषणाचा विषयअनेक वेळा चर्चिला गेला आहे. वालधूनी नदी उल्हास नदीला जाऊन मिळत असल्याने उल्हास नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. हे प्रदूषित पाणी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगरची जनता पित आहे. या प्रदूषित पाण्यामुळे काविळसारखे आजाराने नागरीक आजारी पडतात. प्रदूषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही सरकारचे कान टोचले होते. प्रदूषण प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थाना १०० कोटी पेक्षा जास्त दंड आकारला होता.

गेल्या काही वर्षापासून मनसेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम आणि काही सामाजिक संघटना या प्रकरणी सातत्याने आवाज उठवित आहेत. आंदोलने करीत आहेत. एक दोन वेळा निवडणूकीच्या तोंडावर त्याची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी आश्वासने दिली. मात्र अंमलबजावणी काही केली नाही. हे सत्य आहे. ज्यांनी आश्वासने दिली त्यांनी ही नदी साफ करुन लोकांना शुद्ध पाणी देऊन पुण्य कमाविण्याची नामी संधी आहे. ती त्यांनी सोडू नये. असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापं धुतली जाणार नाहीत अशी खोचक टिका मनसेने नेते राजू पाटील यांनी करीत वालधूनी नदी प्रदूषणाच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे.

टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; ‘त्या’ महिला शेतात आल्या अन्…

Web Title: Clean the valdhuni river and let the citizens drink clean water and raju patil on eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • raju patil

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
3

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
4

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.