Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “त्यांचे खायचे वांदे अन् ते न्युक्लिअर…;” फडणवीसांची पाकिस्तानवर खोचक टीका

जे लोकं पाकिस्तानातून या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जर कोणी अवैधरित्या आलं असेल तर त्यांनाही शोधण्याची कारवाई सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 26, 2025 | 09:53 PM
Devendra Fadnavis: “त्यांचे खायचे वांदे अन् ते न्युक्लिअर…;” फडणवीसांची पाकिस्तानवर खोचक टीका
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर भाष्य केले आहे. त्यांचे खायचे वांदे आहेत, न्युक्लिअर बॉंबच्या गोष्टी ते काय सांगतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर केली. सिंधु करारानुसार पाणी बंद केले, तर पाकिस्तानवर तहानने मरण्याची वेळ येईल असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आले असताना, पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील सहा पर्यटकांच्या परिवारांना जी काही मदतीची आवश्यकता लागेल, ती सर्व मदत राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत सरकारने उचललेल्या पावलांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मत मांडले. ‘‘जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आले आहेत, त्यांना नोटीसा दिल्या असून, ते परत जात आहेत. आपल्याकडे बांगलादेशी ज्या प्रमाणात बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे आढळते, तेवढे पाकिस्तानी आढळत नाहीत.

जे लोकं पाकिस्तानातून या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जर कोणी अवैधरित्या आलं असेल तर त्यांनाही शोधण्याची कारवाई सुरू असते. त्यामुळे आता पहिल्यांदा जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आलेले आहेत, त्यांना ४८ तासांत बाहेर काढायचं आहे. त्या संदर्भात पोलीस व्यवस्थित काम करत आहेत’’, असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी म्हटले आहे.

“खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता ही भारतावर आहे. त्या प्रकारे ते दहशतवाद्यांना समर्थन देतात आणि मानवतेचा एक प्रकारे खून करतात. मला असं वाटतं जगातला कुठलाही देश पाकिस्तानबरोबर उभा राहू शकत नाही. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि ते न्यू क्लिअर बॉम्बचं काय सांगतात?”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Web Title: Cm devendra fadnavis criticizes to pakistan after pahalgam terrorist attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • pahalgam attack
  • pune news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.