Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला करणार राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2025 | 11:22 AM
काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, 'हायकमांड ठरवेल...'

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, 'हायकमांड ठरवेल...'

Follow Us
Close
Follow Us:
  • पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
  • शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज
  • काँग्रेस पक्ष सरकारविरोधात करणार राज्यभर आंदोलन
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती सरकारच जबाबदार आहे. भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली.

अतिवृष्टीने राज्यातील ३० जिल्ह्यातील ३५० तालुक्यात सर्व वाहून गेले आहे. लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचे आश्वासनही फेल गेले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. सर्व जिल्हे, तालुका व गावागावात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

Web Title: Congress party will protest across the state against the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Farmers

संबंधित बातम्या

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ दोघांना न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा
1

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ दोघांना न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा

…तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
2

…तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

वडगाव मावळमध्ये पोलीस प्रशासनात फेरबदल; दोन ठाण्यांना नवे अधिकारी
3

वडगाव मावळमध्ये पोलीस प्रशासनात फेरबदल; दोन ठाण्यांना नवे अधिकारी

काँग्रेसकडून आसाम आणि केरळमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी; रणनीती ठरवणार पक्षाचे भविष्य
4

काँग्रेसकडून आसाम आणि केरळमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी; रणनीती ठरवणार पक्षाचे भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.