तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर उतरत आहे. “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आत्मविश्वासानं लढवणार,” असा ठाम निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
नगरपरिषद निवडणुकीचा माहोल आता पंढरपूरातही जोरदार तापला आहे. २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्जही भरणे सुरू होणार आहेत.
रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भविष्यात त्यांच्या मूळ पक्षाशिवाय गत्यंतर राहणार नाही,” असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम आणि बावधन गणातीत दरेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांनी माध्यमांसमोर जनआक्रोश मोर्चामध्ये केलेलं वक्तव्य आता त्यांना चांगलच भोवलं आहे. याप्रकरणी अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलं.
१७ ऑक्टोबरला दौंड शहरासह तालुक्यातील अनेक भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, ही माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी दिली.
शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
दोन वर्षांत माळेगाव कारखाना कर्जमुक्त करु, असे आश्वासन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री तथा चेअरमन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.