Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Monsoon : कापूस झाला मातीमोल! पावसाच्या तडाख्याने शेतकरी झाला हतबल

विशेष म्हणजे सुगीला अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असुन तडाखा बसला जात असल्याने उभी पिके कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 03, 2025 | 04:32 PM
cotton crop that was about to be harvested was wasted due to unseasonal rains maharashtra farmers

cotton crop that was about to be harvested was wasted due to unseasonal rains maharashtra farmers

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Monsoon: भोकरदन : पावसाच्या तडाख्याने हातची रूबी पिके कुजून गेलीत. हातातोंडाशी आलेली खरीप हंगामी उभी पिके वाया जाऊ लागली आहेत. परिणामी, पावसाच्या तडाख्याने शेतकरी देशोधडीला लागला जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सुगीला परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. परिणामी, शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामी मका, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची काढणी-मळणी ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे सुगीला अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असुन तडाखा बसला जात असल्याने उभी पिके कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बहुतांश भागात पिके सध्या झडण्याच्या स्थितीत आहेत.

हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता

पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, ऐन सुगीच्या हंगामात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दिवाळीनंतर सुगीच्या कामांना वेग येणार होता. खरीप पिके कापणीस सज्ज होती. परंतु, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अखंड पावसाने शेतकऱ्यांचे सर्व नियोजन विस्कळीत केले आहे. शिवारात पाणी साचल्याने पिके झुकली असून, दाणे झडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसाने सर्वाधिक कापसाचे नुकसान

भोकरदन तालुका आणि परिसरात परतीचा पाऊस गेल्या आठवल्यापासून रोज पडत असल्याने आता मोठ्या प्रमाणावर फुटलेला कापूस वेचणी अभावी झाडावरच ओला झाला असून जमिनीवर सडा पडल्यासारखा पावसाच्या फटक्याने विखुरला गेला. मका काही ठिकाणी शनिवारच्या पावसात तर शेतातून दुसऱ्या तिसऱ्या शेतात वाहून गेली आहे यानतर मजूर अभावी मोठ्या प्रमाणावर फुटलेला कापूस देखील शनिवारच्या दणके पावसाने पूर्णतः खराब झाला आहे काळवंडला असून हाती आलेली तोडणी वाया गेली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दुपारी ऊन रात्री पाऊस

काही ठिकाणी कापणी केलेले पीक भिजल्याने शेतक-यांना मौठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या आठवड्यापासून परिसरात सकाळी ऊन, दुधारी पाऊस असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. दुपारपर्यंत वातावरण एकदम उष्ण असते त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन एकदम दमदार पावसाला सुरुवात होते. यंदा वेळेत चांगला पाऊस झाल्याने मका, सोयाबीन, आदी पिके जोमात आली आहेत; परंतु सध्या पिके काढण्याच्या वेळी रोज पाऊस न चुकता हजेरी लावत आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तुरीलाही फटका

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने चांगल्या प्रमाणात भरलेल्या आणि फुलीऱ्यात असलेल्या तुर पिकाला देखील या पावसामुळे मोठा फटका बसला आहे काही ठिकाणी तुरीच्या शेंगा परिपक्व होत असताना सततच्या पावसामुळे शेगा झाडून जात आहे याशिवाय दमट वातावरणामुळे तुरीच्या शैगावर अळीचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी जाणवत आहे त्यामुळे या पावसाचा सर्वच पिकांना फटका बसण्याची दिसून येत आहे.

Web Title: Cotton crop that was about to be harvested was wasted due to unseasonal rains maharashtra farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • daily news
  • maharashtra farmers
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर
1

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी
3

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती
4

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.