Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: “सर्वांच्या सहकार्याने इंद्रायणी नदी…”; DCM एकनाथ शिंदेंची आळंदीत ग्वाही

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सव, इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 10, 2025 | 02:58 PM
Eknath Shinde: “सर्वांच्या सहकार्याने इंद्रायणी नदी…”; DCM एकनाथ शिंदेंची आळंदीत ग्वाही
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक, भाविकांचे श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्रे सरकार, राज्य शासन तसेच सर्वांच्या सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याची ग्वाही देत आळंदी देवस्थानचे ज्ञान भूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास २५ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाचे माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सव, इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आळंदीत तत्पूर्वी ज्ञानोबा माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव शुक्रवारी ( दि.९ ) भाविक, वारक-यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवाला श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा ,आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळ्या निमित्त या रथोत्सव – दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 त्यांनतर इंद्रायणी घाटावर इंद्रायणी पूजन, दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त नदीचे दुतर्फा विद्युत रोषणाई, नदी घाटावर तसेच प्रदक्षिणा मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी, इंद्रायणी नदी पूजन, इंद्रायणी आरती, श्रींचे आरती नाम जयघोषात झाल्या. यावेळी इंद्रायणी नदीचे दुतर्फा महिलांनी प्रज्वलित केलेले दिवे इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या भक्तिभावाने सोडत श्रद्धा जोपासली. व्यापारी तरुण तर्फे दीपोत्सवासाठी विशेष सहकार्य करण्यात आल्याचे माऊली ग्रुपचे प्रमुख माऊली गुळुंजकर, अजित मधवे यांनी सांगितले.
 श्रींचे जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सवात केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उत्तम जाणकार, विजय बापू शिवतारे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी यांचेसह हजारो महिला, पुरुष भाविक मान्यवर उपस्थित होते. हरिनाम गजरात मिरवणूक प्रदक्षिणा श्री विठ्ठल जय घोषात झाली. ग्रामस्थ युवक तरुणांनी ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत नाम जय घोषात रथोत्सव साजरा झाला.
आज इथे बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावी. राज्य शासनाने देखील हे काम मनावर घेतले असून इथे एसटीपी उभारून त्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनासोबतच वारकऱ्यांची देखील याकामी मदत… https://t.co/npFDQUycIZ pic.twitter.com/0ulnePQqwd — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 9, 2025
 यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, राजाभाऊ चौधरी , श्रींचे सेवक बाळासाहेब चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी सेवक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 रथोत्सवाला निघण्यापूर्वी पालखी फुलांनी सजविण्यात आली. या पालखीत माउलींचा चांदीचे मुखवटा पालखीत वैभवी पूजा बांधीत ठेवण्यात आला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत माऊली मंदिरात आणली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी विशेष दक्षता घेत इंद्रायणी नदी लगत आणि पात्रात विशेष स्वच्छता केली. नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने दीपोत्सव वैभवी झाला. इंद्रायणी नदी पात्रात भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली.
  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधत असताना हरीनाम जयघोष केला. हा सोहळा महाराष्ट्रात साजरा होत आहे. या साठी राज्यातून इंद्रायणी तीरावर वारकरी, धारकरी, लाडके भाऊ, बहिणी, भाविक आले आहेत. या सोहळ्यास शुभेच्छा देत ते म्हणाले, ज्ञान भूमी नेहमी येथे बोलवत असते, आळंदी हे ठिकाण आनंद देणारे आहे. मनापासून शुभेच्छा देत त्यांनी लोकांना एक तरी ओवी अनुभवावी असं आवाहन केले. कर्तव्या समोर नाती गोती काही नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील संरक्षणासाठी बैठक घेतली. पहेलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूर राबवून चोखूत्तर दिले. यात आपले येथील दोन जवान शाहिद झाल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्ञानेश्वरीचे महत्त्व किती आहे. सर्वाना माहिती आहे. ते म्हणाले, येथील चर्चेत इंद्रायणी नदी ही माऊली भक्तांची आहे.ती प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. केंद्र व राज्य सरकार मिळून काम करावे लागेल. यासाठी लाखो लोकांचे हात लागतील. सरकारची ही जबाब्दारी आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषण मुक्त करायची आहे. मी हि वारकरी आहे. सर्व संतांचे कृपेने प्रत्येक जण येथे काम करतोय. लोककल्याणकारी योजना राबविल्या. यामुळे हे सरकार तुमचे आहे. वारकऱयांचे आहे. ज्ञानभूमी प्रकल्पाची ४५० एकर जागा असून टप्प्या टप्प्याने काम पूर्ण केले जाईल. येथील आराखडा राबविण्यास सरकार आपल्या पाठीशी आहे.  सर्व एकत्र येऊन काम करू. प्राधान्याने भक्त निवासाचे काम सुरु करू असे सांगत त्यांनी यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी नगरविकासाचे माध्यमातून उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली.
 यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेसह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आळंद देवस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी केले. आळंदी ग्रामस्थ, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, वारकरी संप्रदाय यांनी दीपोत्सव, रथोत्सवास विशेष परिश्रम घेतले. दिंडी मिरवणूक रथोत्सवात अगदी लहानगयांपासून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक, महिला पुरुष हे माऊलींच्या भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हजारो मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

Web Title: Dcm eknath shinde said that indrayani river will be made pollution free clean and beautiful alandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • alandi
  • Dnyaneshwar Mauli
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.