Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Government: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार..? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

अजितदादा, तुम्ही नांदेड जिल्ह्यात तिसऱ्यांदा आलात, तेव्हा काही मागण्याचा मोह आवरत नाही," असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2025 | 05:28 PM
Mahayuti Government: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार..? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

नांदेड:  महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा कोणताही अंदाज लावता येऊ शकत नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस  केंद्रात मंत्री होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. पण निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला, पण आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात पडद्यामागे काहीतरी घडत असल्याचे बोलले जात आहे. अशातच माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्या विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. खतगावकरांनी येत्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होतील असे विधान केलं आहे.

“अजितदादा, मी जे बोलतो ते नेहमी खरे ठरते,” असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खतगावकर अजित पवार यांना म्हणाले की,  “अशोकराव चव्हाण यांना मी एकदा सांगितले होते की, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हाल – आणि तसेच झाले. मी केंद्रात मंत्री असताना दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नेहमी राजकारणावर चर्चा व्हायच्या. आजही त्या चर्चा होत असतात. तिथे माझे काही जवळचे मित्र आहेत. ते मला म्हणाले की, येत्या दीड वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत घेऊन जाणार आहेत. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आजच अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो,” असेही खतगावकर यांनी यावेळी नमूद केले. पण आता खतगावकरांच्या या विधानामुळे राज्याचा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

India-Pakistan ceasefire: युद्धविरामानंतरही पाकिस्तानवर दबदबा कायम; ‘हे’ सहा निर्णय लागू

भास्कर पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “तुम्ही नांदेडमध्ये तिसऱ्यांदा आला आहात. माझ्या पक्षप्रवेश सोहळ्यात लेंडी धरणासाठी निधीची मागणी केली होती आणि ती तुम्ही अवघ्या एका महिन्यात पूर्ण केलीत. आता याच पद्धतीने लक्ष घातल्यास पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि ५० हजार एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल,” असे ते म्हणाले. याचवेळी लेंडी प्रकल्पाप्रमाणेच गोदावरी मनार साखर कारखान्याचा प्रश्नही मार्गी लावावा,   केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवावा.” अशी विनंती करत खतगावकरांनी यावेळी केली.

“अजितदादा, तुम्ही नांदेड जिल्ह्यात तिसऱ्यांदा आलात, तेव्हा काही मागण्याचा मोह आवरत नाही,” असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी सौम्य चिमटाही घेतला. “अशोकाच्या झाडाकडून काही अपेक्षा नसते, तसेच अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारशा अपेक्षा नाहीत,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

Brahmos : ‘ब्राह्मोसची ताकद पाहिलीय का? नसेल तर पाकड्यांना विचारा’; CM योगी कडाडले

अजित पवार यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत सकारात्मक आहे. प्रशासनावरची मजबूत पकड, विषयांचा सखोल अभ्यास आणि काम करण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता — या सगळ्या गोष्टी फार थोड्या लोकांमध्ये पाहायला मिळतात, आणि त्या तुमच्याकडे आहेत. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांच्याही भूमिकेचा उल्लेख करत खतगावकर म्हणाले, “इंद्रनील नाईक यांनी मुंबईचे दौरे थोडे कमी करून गावागावांत फिरावे. दादा, आता या सगळ्यांना घेऊन जिल्ह्यात दौरे करा.”

Web Title: Devendra fadnavis will go to delhi ajit pawar will become the chief minister big leaders statement will create a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.