Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजापूरमधील सुपर बाजार समोरील मालवाहु गाड्यांसाठी वेगळे नियम? वाहतुक कोंडीची समस्या कायम

मुख्यरस्त्यावर असणाऱ्या सुपर बाजार जवळ याच सुपर बाजारातील माल उतरण्यासाठी मोठे ट्रक अर्ध्या रस्त्यावर आडवे लावत असल्याने कायम वाहतुक कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 29, 2024 | 01:43 PM
राजापूरमधील सुपर बाजार समोरील मालवाहु गाड्यांसाठी वेगळे नियम? वाहतुक कोंडीची समस्या कायम
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर शहरात येणाऱ्या मुख्यरस्त्यावर सुपर बाजारच्या समोर सातत्याने मालट्रक रस्त्यात आडव्या उभ्या असताना व वाहतुकीला सातत्याने अडथळा येत आहे. तरी देखील याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी त्या गाड्या काढण्याऐवजी इतर वाहन चालक कायद्याचा बडगा दाखवत असल्याने नक्की यांचे गौडबंगाल काय? असा संतप्त सवाल राजापूर वासियांमधून विचारण्यात येत आहे.

राजापूर शहरात असणारे ट्रॅफिक पोलीस नेहमीच शहरात चर्चेचा विषय झालेला आहे. शहरात सातत्याने धुम स्टाइलने गाड्या चालवणारे अल्पवयीन तरुण, जवाहर चौकातील अस्त्यावस्त वाहतुक याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करणारे पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना मात्र सातत्याने कायद्याचा बडगा उगारुन त्रास देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या आहेत. मात्र राजापूर पोलीस या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याने आता न्याय तरी कुणाकडे मागायचा? असा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे.

गुरुवारच्या आठवडा बाजारादिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दल्ल सुरु असते. तर दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेत शहरात सातत्याने अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. आपली वाहने कुठेही पार्क करत असतात. त्यातच मुख्यरस्त्यावर असणाऱ्या सुपर बाजार जवळ याच सुपर बाजारातील माल उतरण्यासाठी मोठे ट्रक अर्ध्या रस्त्यावर आडवे लावत असल्याने कायम वाहतुक कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे.

सुपर बाजार समोर अशाप्रकारे ट्रक उभे केलेले असताना येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून ते ट्रक काढण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना व वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकानाच दमदाटी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी असणारे वाहतूक पोलीस हे ट्रॅफिक होमगार्ड कर्मचाऱ्यांवर सोडून इतरत्र फिरत असतात. ज्याठिकाणी सातत्याने ट्रॅफिक होते त्या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी कधीच हजर नसतात. तर शहरातील इतर सुनसान ठिकाणी उभे राहुन कायद्याचे बोलण्यात व्यस्त असल्याने आता शहर वासियांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या सुपर बाजाराला कायम पोलीस कर्मचाऱ्यांकडून कशाही गाड्या लावण्याची सुट दिली जात असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुपर बाजारसाठी वेगळे वाहतुकीचे नियम बनवले आहेत का? या सुपर बाजारासमोर आडव्या उभ्या असणाऱ्या वाहनांना कायम अभय का? नेमके काय साटेलोटे आहे? असा संतप्त सवाल आता शहरवासियांमधून विचारण्यात येत आहे.

Web Title: Different rules for goods trains in front of super bazaar in rajapur the problem of traffic congestion remains rajapur ratnagiri maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • maharashtra
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
1

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन
3

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश
4

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.