Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

दरवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी ऊसतोड टोळ्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी टोळीप्रमुखांच्या मागे साकडे घालावे लागत आहे. इतका खर्च करूनही मुळावा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्यात पोहोचलेला नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 02:41 PM
मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

Follow Us
Close
Follow Us:

उमरखेड तालुक्यात दरवर्षी हजारो हेक्टरवर ऊस उत्पादन घेतले जाते. त्यात मुळावा परिसर हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जाणारा भाग आहे. मात्र, यंदा ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड टोळ्यांचा तुटवडा, ऊस कारखान्यांचे ढिसाळ नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड संतप्त झाले आहेत. दरवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी ऊसतोड टोळ्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी टोळीप्रमुखांच्या मागे साकडे घालावे लागत आहे. त्यासाठी टोळीप्रमुखाला ४ ते ५ हजार रुपये, कारखाना कर्मचाऱ्यांना २ हजार रुपये आणि ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला ४०० रुपये असा अघोषित खर्च करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. इतका खर्च करूनही मुळावा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्यात पोहोचलेला नाही. उलट, कारखाना कर्मचाऱ्यांशी जवळीक असलेल्या काही शेतकऱ्यांचा ऊस तातडीने उचलला जातो, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती ‘टिपेश्वर’ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन

ऊसकारखाना यंत्रणा, ऊसतोड टोळ्या आणि वाहतूक व्यवस्था यांच्यात कोणताही समन्वय नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्ग सध्या मानसिक तणावात आणि आर्थिक नुकसानीच्या कड्‌यावर उभा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ऊसापेक्षा खोडवा ऊसाला प्राधान्य, ओळखीच्या शेतकऱ्यांचा ऊस आधी उचलणे आणि सामान्य शेतकऱ्यांची उपेक्षा या प्रकारामुळे ऊसकारखाना यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुळावा परिसरातील शेतकऱ्यांचा एक गट आता या मनमानी कारभाराविरोधात थेट साखर आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली.

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश, ग्राम विकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

आम्ही मेहनतीने ऊस पिकवतो, पण तो नेण्यासाठी टोळ्याच्या आणि कारखान्यांच्या दारात भीक मागावी लागते, ही शोकांतिका आहे. पैसे दिले तरच ऊस उचलला जातो, ओळखी असतील तर आधी नंबर लागतो. हा कारभार थांबला नाही, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. आम्हाला सवलती नकोत फक्त न्याय्य, पारदर्शक आणि नियोजनबद्ध व्यवस्था हवी आहे.- भय्यासाहेब देशमुख, प्रगतशील शेतकरी, मुळावा असे म्हणाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Dilemma of sugarcane producers in mulawa area the scarcity of gangs the arbitrariness of factories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • maharashta
  • Yavatmal
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
1

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…
2

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.