Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 07, 2025 | 10:41 AM
Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Follow Us
Follow Us:

मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकराने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर ई-वाहनांना टोलमाफी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा एसटी महामंडळाला फायदा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन धावणाऱ्या ई-शिवनेरी बसचा दिवसाचा सुमारे चार लाख रुपयांचा टोल वाचणार आहे.

एसटीला अशाप्रकारे मोठी सवलत मिळणार असल्याने एसटीची महिन्याला अंदाजे सव्वा कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्यातील इलेट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोलनाक्यावर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार 23 ऑगस्टपासून ‘अटल सेतू’सह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. पुणे पिंपरी-चिंचवड, मुंबई या पट्ट्यांत ई-वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या वाहनांना टोलमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे. पुणे ते मुंबई, दादर, ठाणे, बोरिवली, मंत्रालयासाठी दररोज ९६ ई-शिनवेरी धावतात. या सर्व इ-शिवनेरी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून धावतात. या सर्व ई-बसच्या दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यांना उर्से, खालापूर टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो.

दोन लाखांचा भरावा लागतोय टोल

द्रुतगती महामार्गावरुन धावणाऱ्या इ-शिवनेरीला दिवसाला दोन लाख रुपयांचा टोल भरावा लागत होता. याशिवाय पुणे ते मंत्रालय, स्वारगेट ते मंत्रालय, दादरसाठी सुटणाऱ्या चौदा फेऱ्यांना ‘अटल सेतू’वरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या बसना ‘अटल सेतू’ येथे अतिरिक्त ० टोल द्यावा लागत होता.

…तर फायदा महामंडळाला

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे लाखो रुपये दिवसाला वाचणार आहेत. पुण्यातून समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या बसमध्ये सध्या तरी एकही ई-बस नाही. त्यामुळे त्याचा फायदा सध्या तरी एसटी महामंडळाला मिळणार नाही.

Web Title: E vehicles get toll waiver st benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Maharashtra Transport
  • Road Transport
  • st bus

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

आषाढी यात्रेतून अकोला एसटी विभागाला 2 कोटींचे उत्पन्न; 363 बसफेऱ्यांतून 4 लाख किमीचा केला प्रवास
2

आषाढी यात्रेतून अकोला एसटी विभागाला 2 कोटींचे उत्पन्न; 363 बसफेऱ्यांतून 4 लाख किमीचा केला प्रवास

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
3

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन
4

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.