Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 07, 2025 | 10:41 AM
ई-वाहन टोलमाफी एसटीच्या पथ्यावर

ई-वाहन टोलमाफी एसटीच्या पथ्यावर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकराने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर ई-वाहनांना टोलमाफी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा एसटी महामंडळाला फायदा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन धावणाऱ्या ई-शिवनेरी बसचा दिवसाचा सुमारे चार लाख रुपयांचा टोल वाचणार आहे.

एसटीला अशाप्रकारे मोठी सवलत मिळणार असल्याने एसटीची महिन्याला अंदाजे सव्वा कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्यातील इलेट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोलनाक्यावर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार 23 ऑगस्टपासून ‘अटल सेतू’सह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. पुणे पिंपरी-चिंचवड, मुंबई या पट्ट्यांत ई-वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या वाहनांना टोलमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे. पुणे ते मुंबई, दादर, ठाणे, बोरिवली, मंत्रालयासाठी दररोज ९६ ई-शिनवेरी धावतात. या सर्व इ-शिवनेरी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून धावतात. या सर्व ई-बसच्या दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यांना उर्से, खालापूर टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो.

दोन लाखांचा भरावा लागतोय टोल

द्रुतगती महामार्गावरुन धावणाऱ्या इ-शिवनेरीला दिवसाला दोन लाख रुपयांचा टोल भरावा लागत होता. याशिवाय पुणे ते मंत्रालय, स्वारगेट ते मंत्रालय, दादरसाठी सुटणाऱ्या चौदा फेऱ्यांना ‘अटल सेतू’वरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या बसना ‘अटल सेतू’ येथे अतिरिक्त ० टोल द्यावा लागत होता.

…तर फायदा महामंडळाला

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे लाखो रुपये दिवसाला वाचणार आहेत. पुण्यातून समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या बसमध्ये सध्या तरी एकही ई-बस नाही. त्यामुळे त्याचा फायदा सध्या तरी एसटी महामंडळाला मिळणार नाही.

Web Title: E vehicles get toll waiver st benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Maharashtra Transport
  • st bus

संबंधित बातम्या

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
1

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

Pratap Sarnaik: अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आवाहन
2

Pratap Sarnaik: अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आवाहन

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका
3

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
4

एसटीच्या आर्थिक संकटात वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.