
3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा (Photoसौजन्य-सौशलमीडिया)
नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे गोदावरी नदीला आला दरम्यान अनेक रस्ते आणि वसाहती पाण्याखाली आल्या होत्या. नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. पुराचा झटका कमी होताच, मात्र नागरिकांना आता भूकंपाच्या धक्क्यांना समोरे जावे लागत आहे.(Maharashtra News:)
Nashik News: धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत …
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा, कळवण, पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास दोनवेळा भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळे काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरगाणा तालुक्यातील सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या भागांमध्येही हा धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे कळवण, पेठ आणि दिंडोरी परिसरातही भूकंपाची तीव्रता सुमारे 3.5 रिश्टर स्केलच्या आसपास नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून संबंधित अधिकारी घटनास्थळी सतर्क आहेत. महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सर्व माहिती भूकंप निरीक्षण केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातही शनिवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या परिसरात यापूर्वीही अशा स्वरूपाचे लहान-मोठे हादरे वारंवार जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. जरी धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी सतत होणाऱ्या हालचालींकडे प्रशासन आणि भूगर्भशास्त्र विभागाचे लक्ष आहे.
हिंगोली जिल्ह्यात तर मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाची नोंद होत आहे. शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा जमिनीला हलका कंप जाणवला. हा धक्का सायंकाळी सुमारे 6.50 वाजता जाणवला असून त्याची नोंद अधिकृत भूकंप मापन केंद्रात करण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हाण परिसराच्या जवळ, जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सततच्या भूकंपाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नैसर्गिकरित्या भीतीचे वातावरण असले तरी तज्ज्ञांच्या मते अशा सौम्य धक्क्यांमुळे घाबरण्याचे कारण नसते. मात्र सतर्क राहणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर पसरवू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.