Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

जिल्ह्यात मोठे जलसिंचन प्रकल्प नसल्याने मुबलक पावसाचे पाणी शेजारील जिल्ह्यांत वाहून जाते. पाणीटंचाई दूर करण्यासाठी पैनगंगा नदीसह इतर नद्यांवर ८६ कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2026 | 09:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जिल्ह्यात मोठे जलसिंचन प्रकल्प नसल्यामुळे मुबलक पर्जन्यमान असूनही पावसाचे पाणी शेजारील जिल्ह्यांकडे वाहून जाते. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठीही गंभीर समस्या निर्माण होते. हीच पाणीटंचाई दूर करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रासह इतर लहान-मोठ्या नद्यांवर कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अनेक बंधारे कोरडे ठणठणीत पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ! एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

वाशिम जिल्ह्याची भौगोलिक रचना उंच पठारावर असल्याने येथे मोठे धरण किंवा प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने सिंचनासोबतच नदीकाठच्या गावांतील पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने पैनगंगा नदीपात्र व उपनद्यांवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने तब्बल ८६ कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन भूजल पातळीत वाढ झाली होती. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होत होते.

या बंधाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे ४ हजार ४५० टीएमसी पाणी जिल्ह्यात साठवण्यात यश आले होते. परिणामी जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. मात्र कालांतराने या बंधाऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. अनेक बंधाऱ्यांना तडे गेले असून काही ठिकाणी गेट्स तुटलेली किंवा निकामी अवस्थेत आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवले जात नसून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ते कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यातील ८६ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी वाशिम तालुक्यात १७, रिसोडमध्ये ३०, मालेगावमध्ये ८, मानोऱ्यात १२, मंगरुळपीरमध्ये १० तर कारंजा तालुक्यात ६ बंधारे आहेत. यापैकी बहुतांश बंधारे सध्या पाण्याविना कोरडे पडले आहेत. याचा थेट फटका रब्बी हंगामातील शेतीला बसत असून बंधाऱ्यांवर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली आहेत.

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

याशिवाय नदीकाठच्या गावांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत असून प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व देखभालीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.

Web Title: Failure to stop water in kolhapuri dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन
1

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

Washim News : ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ साठी नामांकित ‘या’ शाळेने मारली बाजी! खामगावात होतंय कौतुकाचं वर्षाव
2

Washim News : ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ साठी नामांकित ‘या’ शाळेने मारली बाजी! खामगावात होतंय कौतुकाचं वर्षाव

Washim News : प्रशासन सज्ज; दहावीचे २० हजार तर बारावीचे २२ हजार परीक्षार्थी
3

Washim News : प्रशासन सज्ज; दहावीचे २० हजार तर बारावीचे २२ हजार परीक्षार्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.