Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा बी.आर.एस.पक्षात प्रवेश 

 शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूरात मेळावा घेणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.सी. राव यांनी केली.

  • By Aparna
Updated On: Aug 02, 2023 | 02:09 PM
शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा बी.आर.एस.पक्षात प्रवेश 
Follow Us
Close
Follow Us:
इस्लामपूर : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूरात मेळावा घेणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.सी. राव यांनी केली.
साखराळे ( ता. वाळवा)  येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी सदिच्छा भेट दिली. रघुनाथदादा पाटील यांनी प्रमुख सहकाऱ्यांसमवेत बी. आर. एस. पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री के सी राव यांनी रघुनाथदादांच्या गळ्यात बीआरएस पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत केले. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी अब की बार किसान सरकार, रघुनाथदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. के.सी. राव यांनी रघुनाथदादांच्या घरी स्नेहभोजन केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
रघुनाथदादा पाटील म्हणाले,बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आहे. के.सी. राव यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा झाली. अनेक प्रश्नांची समर्पक उत्तर मिळाल्यानंतर पक्षात प्रवेश केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारा व त्यांचे प्रश्न सोडविणार एकही राजकीय पक्ष महाराष्ट्रात नाही. बीआरएसपक्षा तेलंगणातील शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत दिले असून अनेक सवलतीही दिल्या आहेत. त्यामुळे देशात केवळ हाच पक्ष शेतकऱ्यांना न्याय देईल अशी आमची धारणा झाली आहे. महात्मा गांधींनी ९ ऑगस्टला इंग्रजांना भारत छोड़ो असे सांगितले होते. संपूर्ण राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूरातून सर्व भ्रष्ट राजकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना महाराष्ट्र छोडो असे सांगणार आहे. यावेळी भगीरथ भालके, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अॅड. अजित काळे, बी.जी.पाटील, हणमंतराव पाटील, शंकर मोहिते, गणेश शेवाळे, लक्ष्मण पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Farmer leader raghunath patils entry into brs party nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 02:09 PM

Topics:  

  • Islampur
  • Raghunath Patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचा राजीनामा न घेतल्यास…”; राष्ट्रवादी कॉँग्रेसचा इशारा
1

Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचा राजीनामा न घेतल्यास…”; राष्ट्रवादी कॉँग्रेसचा इशारा

गणेशोत्सव पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; सोशल मीडिया रिल्स अन् ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन
2

गणेशोत्सव पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; सोशल मीडिया रिल्स अन् ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास
3

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास

Islampur : मोठी बातमी! अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, भुजबळांची विधानसभेत घोषणा
4

Islampur : मोठी बातमी! अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, भुजबळांची विधानसभेत घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.