Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल

खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 28, 2025 | 06:35 PM
चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल

Follow Us
Close
Follow Us:

चाकण : खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला असून, सणासुदीच्या काळातही नागरिक पावसामुळे घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. सोयाबीन, मका, फ्लावर, कोबी, भाजीपाला, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आधीपासूनच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

व्यापाऱ्यांची चिंता वाढली

सध्या नवरात्र उत्सव सुरू असून दसरा तोंडावर आला आहे. रविवारी आठवडे बाजाराचा दिवस असूनही सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत. शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असली तरी हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज दिल्याने व्यापाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसामुळे व्यवसाय ठप्प राहण्याची शक्यता असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातून शेतकरी बाजारात आपला माल विक्रीसाठी आणतात. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आणि खरेदीदारांनी बाजारात येण्यास पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.

पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

सततच्या पावसामुळे चाकण शहर तसेच महामार्ग लगत असणाऱ्या जोडरस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी रस्ते, गल्लीबोळात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा : ‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी

परतीच्या पावसामुळे पिकांना लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सततचा पाऊस, पूरस्थिती आणि निचरा यामुळे हा पाऊस वरदान ठरण्याऐवजी शाप ठरत आहे, असे नागरिक सांगत आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Farmers in khed taluka have suffered huge losses due to rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • Chakan News
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
2

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.