Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे : राजू शेट्टी

पदयात्रेत ताकद असते महात्मा गांधीनी मीठाच्या सत्त्यागृहासाठी पदयात्रा काढली.ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात ६०० किमी ची आणि २२ दिवसाची जन आक्रोश पद यात्रा सुरू आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 17, 2023 | 07:18 PM
शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे : राजू शेट्टी
Follow Us
Close
Follow Us:

कवठेमहांकाळ  : पदयात्रेत ताकद असते महात्मा गांधीनी मीठाच्या सत्त्यागृहासाठी पदयात्रा काढली.ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात ६०० किमी ची आणि २२ दिवसाची जन आक्रोश पद यात्रा सुरू आहे.  पद यात्रेच्या चौथा दिवशी शिरढोन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. रविवारी ही पद यात्रा सलगरे कोंग्नोली करोली हिंगण गाव कवठेमहांकाळ मार्गे शिर दोन येथे आली. या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, टी. व्ही. पाटील, सरपंच शारदा पाटील, रजनीकांत पाटील, माणिक पाटील, कॉ दिगबर कांबळे उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ऊसाला चांगला भाव मिळावा, दुधाला हमीभाव दिला पाहिजे, द्राक्ष बेदाणा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्ज मुक्ती झाली पाहिजे, यासाठी महेश खराडे तळपत्या उन्हात पायाला भिंगरी बांधून चालत अाहेत. त्यांना साथ देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून पक्ष जात धर्म यांच्या भिंती भेदून ऊस द्राक्ष बेदाणा दूध डाळिंब भाजीपाला यासाठी खराडे यांच्याबराेबर चालावे. तुम्ही चालाल तर वाचाल. शेतकऱ्यांनी जो आपल्या हितासाठी लढतो आहे, त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे.

प्रास्ताविक दिगंबर कांबळे यांनी केले. यावेळी सूरज पाटील, शिवाजी पाटील, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबेकाई, श्रीधर उदगावे, अजित हलिगळे, विश्वजित काळे, नितीन बागणे, स्वप्नील बागने, संदीप शिरोटे, अनिल वाघ, प्रशांत शिंदे, विजय पाटील, संपत पाटील, सचिन वाघ, शेतकरी उपस्थित होते.

 दर ठरल्याशिवाय कुणाला ऊस देवू नका
महेश खराडे म्हणाले, यंदा ऊसाचे पीक फारच कमी आहे. देशासह जगात साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे ऊस नेण्यासाठी कारखानदारांची स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे ऊस दर ठरल्याशिवाय कुणाला ऊस देवू नका. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही. गेली चार दिवस चालतो आहोत. आणखी १८ दिवस चालणार आहोत. तुम्ही या पद यात्रेत सहभागी व्हा. आम्ही चालतोय, तुम्हीही चाला असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Farmers should participate in jan awach pad yatra raju shetty nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2023 | 07:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • raju shetty
  • sangli news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.