Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सुरु

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2025 | 02:57 PM
सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरु

सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरु

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकचा साखर हंगाम २० तारखेपासून सुरु
  • महाराष्ट्राच्या सीमा भागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या
  • कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत
गडहिंग्लज : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगाव, विजयपुर, बागलकोट, गदग, दावणगिरी, बेल्लारी आणि हावेरी जिल्ह्यांतील साखर कारखाने २० ऑक्टोबंरपासून उस गाळप सुरू करतील, असा फतवा काढल्याने कर्नाटक हद्दीतील साखर कारखाने या वर्षी दहा दिवस आधी सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील दोन अशा पाच साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केल्याने महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी त्या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे सीमाभागातील साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याची शक्यता कमी असली तरी महाराष्ट्रातील उस कर्नाटकात गाळपासाठी जाण्याची शक्यता अधिक आहे.

कर्नाटकातील साखर कारखाने गेली अनेक वर्षे अपेक्षित गाळपापेक्षा जास्त गाळप करून महाराष्ट्रातील उस पळवत आहे. गेल्या वर्षीच कर्नाटकात महाराष्ट्रातूন सुमारे ४५ लाख मेट्रिक टन ऊस गेला होता या वर्षी दोन्ही राज्यांचा हंगाम १ नोव्हेंबर दरम्यान सुरु करण्याची शक्यता होती पण पुन्हा कर्नाटकने महाराष्ट्राच्या हंगामापूर्वी दहा दिवस आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका महाराष्ट्राच्या कारखान्यांना बसणार आहे

राज्य सरकारच्या मंत्री समितीच्या बैठकीत कर्नाटकने लवकर हंगाम सुरू केल्यास सीमा भागातील कारखाने देखील हंगाम सुरू करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात असताना एकीकडे महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी विनापरवाना लवकर उस गाळ्प केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला असल्याने व कर्नाटकातील हंगाम सुरू होत असल्याने सीमाभागातील कारखान्यांची कोंडी झाली आहे.

Web Title: Fears are being expressed that farmers in maharashtra will give sugarcane to factories in karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Karnataka
  • Shugarcane

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.