Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक रुपयात पीक विम्याला भुलले! दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना विमा उतरवण्यासाठी मदत म्हणून एक रुपया मध्ये विमा योजना आणली. याच योजनेला दुष्काळी भागातील शेतकरी भुलले आणि न पेरलेल्या पिकाचा विमा भरला, मात्र आता दुष्काळ पडला असल्याने दुष्काळी उपाययोजनेला शेतकरी मुकणार आहेत, कारण कागदावर मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसू लागले आहे.

  • By Aparna
Updated On: Aug 24, 2023 | 11:55 PM
farmer waiting for rain

farmer waiting for rain

Follow Us
Close
Follow Us:

आटपाडी : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना विमा उतरवण्यासाठी मदत म्हणून एक रुपया मध्ये विमा योजना आणली. याच योजनेला दुष्काळी भागातील शेतकरी भुलले आणि न पेरलेल्या पिकाचा विमा भरला, मात्र आता दुष्काळ पडला असल्याने दुष्काळी उपाययोजनेला शेतकरी मुकणार आहेत, कारण कागदावर मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसू लागले आहे.

एक रुपया लालसेने ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी सुद्धा झाली नाही, अशा शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक आहे, असे कागदोपत्री नोंदी दाखवून पिक विमा भरला आहे. व याच कागदापत्राच्या आधारे तालुक्यातील पीक पेरणीचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. या अहवालात यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त टक्के पेरणी झाल्याची नोंद केली आहे. ही बाब जेव्हा येथील स्थानिक जागरूक नेत्यांच्या व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली तेव्हा तालुक्यामध्ये बाजरी पिकाची पेरणी १०८ टक्के  इतकी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र तालुक्यात पाऊस नसल्यामुळे कोठेही पेरणी झालेली नाही, ही बाब समोर आल्यानंतर मनसेचे कृषी सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तालुक्यातील खरीप हंगामातील आकडेवारी चुकीची असल्याचे निदर्शनास आणले.परंतु शासनाच्या चुकीच्या अहवालामुळे तालुक्यातील कोणताही शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहू नये, अशा पद्धतीचे अहवाल तयार करावेत, अशी मागणी केली आहे.

शासकीय मदतीवर परिणाम
एकंदरीतच एक रुपया मध्ये शासनाने सुरू केलेली पिक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. परंतु पीक विम्याच्या लालसेने शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊन पीक विमा भरला आहे. दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांबरोबर इतरही वर्ग राहत असतो. फक्त शेतकऱ्यांना मदत मिळाली तर सर्वांना मदत मिळते असं होत नाही. शेतीमध्ये काम करणारे शेतमजूर, व्यावसायिक, भूमिहीन असे अनेक घटक या भागांमध्ये राहत असतात.

दुष्काळ जाहीर हाेण्यास अडथळा
दुष्काळी परिस्थितीमध्ये शासनाकडून अनेक सोयी सुविधा जाहीर केल्या जातात, मात्र जर कागदोपत्री दुष्काळ नाही, असे असेल तर शासनाकडून दुष्काळ जाहीर होणार नाही. आणि शासनाकडून दुष्काळी भागासाठी दिल्या जाणाऱ्या मदती मिळणार नाहीत. त्यामुळे एक रुपयाच्या लालसेमुळे दुष्काळी भागातील नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे हे मात्र नक्की आहे.

Web Title: Forgot crop insurance for one rupee farmers in drought hit areas will be hit hard nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2023 | 11:55 PM

Topics:  

  • Atpadi
  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
1

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
3

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.