Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 01:54 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; 'या' तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; 'या' तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक
  • तासगावात करणार चक्काजाम आंदोेलन
तासगाव : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे द्राक्ष, ऊस, सोयाबीन, मका, उडीद, भुईमुग आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत १४ ऑक्टोबर रोजी तासगावमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा, आंदोलनाची तयारी

पाटील यांनी तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे आणि नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली.
यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे आणि तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी असलेले निवेदन दिले. दरम्यान, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात निवेदन सादर केले.‘

पंचनाम्यांची गती संथ, शेतकरी अडचणीत’

निवेदनात नमूद केले आहे की, पंचनाम्यांची प्रक्रिया अत्यंत विलंबाने सुरू असून अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली आहे. यंदाच्या नुकसानीमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी माणिक जाधव, सुखदेव पाटील, बाबासाहेब पाटील, सुनील जाधव, हणमंत पाटील, महेश पाटील, अविनाश पाटील, संदीप पाटील, शशिकांत जमदाडे, दिग्विजय पाटील, आर. डी. पाटील, जाफर मुजावर, अमित पवार, करण पवार, तुषार हुलवाणे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

“शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर १४ ऑक्टोबरला तासगाव रस्त्यावर उतरेल.” — संजय पाटील, माजी खासदार

‘शेतकरीप्रेम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर?’

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. “हे शेतकरीप्रेम निवडणुकीच्या तोंडावरच का उमटतं?” असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात असून, आमदार वं माजी खासदार गटांतील समर्थक आपापल्या नेत्याच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकाच वेळी आंदोलनाची तयारी करत असल्याने तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सध्या राजकीय तापमान वाढलेले आहे.

Web Title: Former mp sanjay patil to protest over farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • sanjay patil

संबंधित बातम्या

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित
1

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
3

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प
4

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.