Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 01:33 PM
उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

Follow Us
Close
Follow Us:
  • उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार?
  • सकारात्मक निर्णयाचे संकेत
  • पुण्यात लवकरच संयुक्त बैठक होणार
इंदापूर : उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, अशी ठाम मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

 

उजनी धरण उभारणीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड आणि कर्जत तालुक्यातील तब्बल ८१ गावांनी त्याग केला. हजारो शेतकऱ्यांनी नाममात्र मोबदल्यात आपली जमीन शासनाला दिली. मात्र आजही अनेक धरणग्रस्त गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या असून, पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. अशा परिस्थितीत १७ जून २०१९ व ८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार धरण क्षेत्रालगतच्या अतिरिक्त जमिनी पी.पी.पी. तत्वावर ४९ वर्षांच्या कराराने देण्याच्या प्रस्तावाला धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे.

शेतकऱ्यांच्या मते, संपादित झालेल्या परंतु प्रत्यक्षात पाण्याखाली न गेलेल्या जमिनींवर ते अनेक वर्षांपासून गाळपेर करून जनावरांसाठी चारा पिके घेत आहेत. आता त्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न अन्यायकारक असून त्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आहे. १९७३ व १९७४ च्या महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार कामासाठी न लागलेली जमीन मूळ मालकांना परत देण्याचे धोरण असताना नव्या निर्णयात त्यास विसंगती दिसून येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान, या सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा ‘अभिषेक’; ‘या’ तारखेला होणार निवडीवर शिक्कामोर्तब

पुण्यात लवकरच संयुक्त बैठक

उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पुणे येथे लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली असून, या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

Web Title: Dam victims in ujani catchment area likely to get relief from government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Patil
  • Ujni

संबंधित बातम्या

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी
1

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…
2

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात
3

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या
4

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.