
मुंबई – मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सकाळी-सकाळी कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांची लगबग असते. परंतू याचे वेळेत मुंबईकरांची मोठी गैरसोय होत आहे. कारण आज मध्य रेल्वेच्या गाड्या विस्कळित झाल्या आहेत. परिणामी गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. मात्र लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याने सकाळी ऑफिस लवकरच गाठयाचे असते, त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, मध्य मार्गावरील लोकल गाड्याही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. सीएसटी ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सकाळी ७ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र आधी लोकल वाहतूक ठप्प झाल्याने अजूनही हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. त्यामुळं मुंबईकरांना त्रास होत आहे.