Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच; पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना आता…

नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. नदीकाठच्या शेतात देखील सर्वत्र पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2024 | 01:17 PM
Kolhapur Rain

Kolhapur Rain

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील 150 गावे पुराच्या विळख्यात सापडली असून, अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 41 फूट इतकी आहे. धोका पातळी गाठण्यास अवघे 2 फूट शिल्लक असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. नदीची धोका पातळी 41 फुटांवर आहे. हवामान विभागाने आज जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असून, त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे.

संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे. कोल्हापुरात ७८ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, ग्रामीण भागातही स्थलांतर सुरू आहे. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर ९० टक्के पाण्याखाली

नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. नदीकाठच्या शेतात देखील सर्वत्र पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अलमट्टीतून दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम

चिक्कोडी : अलमट्टी जलाशयातून सोमवारीही दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम ठेवला आहे. दोन दिवसांच्या तुलनेत धरणात पाण्याची आवक थोडीशी वाढली असली, तरी विसर्ग कायम ठेवल्याने कृष्णेची पातळी गतीने वाढलेली नाही. धरणात ९३ टीएमसी पाणीसाठा आहे.

Web Title: Heavy rain continues in kolhapur panchganga river has crossed the warning level nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • kolhapur
  • Kolhapur Rain

संबंधित बातम्या

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
1

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
2

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश
3

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश
4

अभिमानास्पद! हिंदवी स्वराज्यातील ‘या’ किल्याचा राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.