Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान

तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2024 | 11:49 AM
Heavy Rain

Heavy Rain

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. अनेक भागात पुलावर, रस्त्यावर व गल्लीबोळात पाणी साचल्याने जनतेला कसरत करावी लागत आहे. अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेदेखील वाचा : नांदेड जिल्ह्यात आभाळ कोसळले, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान

तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतातील बांध, कालवे फुटून शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघून प्रशासनाने शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश येल्टीवार व अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांना सुरुवात, 40 लाख नागरिकांच्या तपासण्यांचे ध्येय

विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस

अमरावतीसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात बुधवारी (दि. 4) सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.

सण-उत्सवाच्या काळात हजेरी

ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Heavy rain in yavatmal district water on the roads nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.