Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-केवायसी नसल्याने शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित; आधीच नुकसान त्यात भरपाईसाठी प्रतिक्षा…

तसेच जनावरांसाठीचा सुका चारा, वैरण पूर्णपणे भिजून काळी पडली होती. या वैरणीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तर ओला चारा मका पीक वाया गेले होते. मका उत्पादनात प्रचंड घट आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2025 | 11:54 AM
ई-केवायसी नसल्याने शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित; आधीच नुकसान त्यात भरपाईसाठी प्रतिक्षा...

ई-केवायसी नसल्याने शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित; आधीच नुकसान त्यात भरपाईसाठी प्रतिक्षा...

Follow Us
Close
Follow Us:

यंदा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आंबेगाव तालुक्यात मार्च ते मे या महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 4 हजार 702 शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने ही भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करता येत नसल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

मार्च ते मे यादरम्यान आंबेगाव तालुक्यात नारोडी, चास, कुरवंडी, गिरवली, चांडोली, सकोरे, लौकी धोंडमाळ, लाखनगाव आदी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. तालुक्यात सुमारे 3775 एकर बाजरी पीक संपूर्णपणे पाण्यात होती. बाजरीची कणसे पाण्यात राहिल्याने त्याला चौरे फुटले होते तर मका पिक संपूर्ण जमीनदोस्त झाले होते. सततच्या पावसाने उन्हाळी भुईमूग पिवळा पडला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला.

तसेच जनावरांसाठीचा सुका चारा, वैरण पूर्णपणे भिजून काळी पडली होती. या वैरणीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तर ओला चारा मका पीक वाया गेले होते. मका उत्पादनात प्रचंड घट आली. यामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे ऊस जमिनीलगत पडले होते. पालेभाज्या वर्गीय पिकांची अवस्था अतिशय वाईट होती. कोथिंबीर, धना पिके सततच्या पावसाने कुजून गेली होती.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे आंबेगावातील अनेक भागात पंचनामे झाले. एनडीआरएफच्या निकषानुसार 90 रुपये प्रति गुंठा नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान जमा करण्यात ई-केवायसीचा अडथळा येत आहे. यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदतही न मिळाल्याने असंख्य शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, अशी माहिती देण्यात येत आहे.

हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी होती. पण शासनाने तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा घाट घातला आहे. त्यातच शासनाच्या ॲपमध्ये अडथळे येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी करता येत नाही. यामुळे बँकेत पैसे जमा झाले नाहीत. त्वरित ई-केवायसी करण्यात महसूल विभागाने मदत करावी, अशी मागणी सध्या केली जात आहे.

Web Title: Hundreds of farmers deprived of compensation due to lack of e kyc 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • e-KYC
  • Farming News
  • maharashtra farmers
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
1

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
2

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
3

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
4

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.