Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News : एक विहीर अन् 350 नागरिक…, भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. असं एक गाव जेथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2025 | 04:15 PM
एक विहीर अन् 350 नागरिक..., भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण (फोटो सौजन्य-X)

एक विहीर अन् 350 नागरिक..., भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभर कडक ऊन आणि पहाटे तीव्र थंडी लागत आहे. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात लागत आहेत. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ही काहीस असचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र या पुनर्वसन झालेल्या गावात केवळ एकच विहीर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनाना तारेवरची कसरत कराव लागत आहे.

गावात केवळ एकच विहीर

बावनथडी धरण क्षेत्रात येणाऱ्या कमकासुर व सुसूरडोह या गावांचे पुनर्वसन रामपूर व बघेडा येथे करण्यात आले. रामपूर पुनर्वसन गावात केवळ एकच विहीर असून ३५० नागरिकांची ती तहान भागवीत आहे. येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे येथील आदिवासी बांधव मजुरी सोडून पिण्याचे पाणी मिळावे याकरिता गावातील विहिरीवर दिसून येतात. राज्य शासनाने येथील ग्रामस्थांकरिता १० कोटींच्या पॅकेज पुनर्वसन व्हावे याकरिता घोषित केला होता परंतु त्यापैकी केवळ ३.५० कोटी रुपये आतापर्यंत येथील नागरिकांना मिळाला आहे.

कमकासुरचे पुनर्वसन रामपूर येथे झाले तेथे केवळ एकच विहीर उपलब्ध करून देण्यात आली. हे गाव शंभर आदिवासी बहुल आहे. येथील नागरिक हे बहुतांश मजुरी करतात. कुटुंबाला पाणी मिळावे याकरिता ते मजुरीवर जात नसल्याची माहिती आहे. केवळ पाण्याकरिता मजुरीवर पाणी फेरावे लागते. पाण्यासारखी मूलभूत समस्या मागील पंधरा वर्षापासून येथे सुटलेली नाही.पुनर्वसन झालेल्या रामपूर हमेशा येथे अजूनपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ससुरडोह या गावाला हे गाव जोडण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना सुसरडोह येथे तीन ते चार किलोमीटर अंतरावर विविध दाखल्यांकरिता जावे लागते. ग्रामपंचायत नसलेले राज्यातील हे पहिलेच गाव असावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्याचे आदिवासी मंत्री आज जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या सोडवण्याकरिता बैठक घेत आहेत त्याच या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो. बावनथडी धरण क्षेत्रात तुमसर तालुक्यातील कमकासुर व सुसूरडोह ही गावे धरणात समाविष्ट झाली. त्यांचे पुनर्वसन राज्य शासनाने कमकासुरचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) तर ससुरडोहचे पुनर्वसन बघेडा येथे केले. तब्बल १५ वर्षानंतरही या गावात मूलभूत समस्या अजून पर्यंत सुटल्या नाहीत अशा तक्रारी आहेत.

Web Title: In a backward village in bhandara district citizens are wandering for water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • water

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.