Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

मुंबईत जवळपास ६० टक्के लोक अनधिकृत बांधकामात राहतात. बांधकामाच्या वेळीच कारवाई न झाल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले. दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन अभय दिल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 22, 2025 | 02:27 PM
Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

Thane News: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार मालिकेत आज तिसरा जनता दरबार गडकरी रंगायतन येथे पार पडला. यापूर्वी पहिला दरबार खारकर आळी येथे आणि दुसरा डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या विविध तक्रारी व अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दरबारात बोलताना गणेश नाईक म्हणाले की, त्यांच्या समस्या नक्कीच सोडवल्या जातील. सामान्य माणसांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले

यावेळी नाईक यांनी बिल्डर लॉबीवर जोरदार टीका केली. “अनेक बिल्डर पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात, मात्र नव्या इमारती उभारल्यानंतर हक्काचे घर देण्यात ते टाळाटाळ करतात. या संदर्भात प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील जनता दरबारात या प्रकरणांबाबत अधिक तपशीलवार माहिती सादर केली जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्

माजी मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात घोडबंदर रस्त्यांवरील खड्डे आणि शीळ-डायघर परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या गंभीर प्रश्नांवर भाष्य केले. नाईक म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी रस्त्यांबाबत केलेले निरीक्षण अगदी योग्य आहे. काही रस्ते फक्त हलक्या वाहनांसाठी डिझाइन केलेले असतात, मात्र त्याच रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खड्डे निर्माण होतात. वाहतुकीची आवक-जावक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते.” या पार्श्वभूमीवर संबंधित विभाग – महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) – यांना खड्डे तातडीने भरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

शीळ-डायघर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर इशारा

नाईक यांनी शीळ-डायघरमधील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या समस्यांवरून ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. “मुंबईत जवळपास ६० टक्के लोक अनधिकृत बांधकामात राहतात. बांधकामाच्या वेळीच कारवाई न झाल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले. दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन अभय दिल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे,” असे ते म्हणाले.

गणेश नाईक म्हणाले, “जर बांधकाम सुरू होत असतानाच अधिकाऱ्यांनी कठोर पाऊले उचलली असती, तर नागरिकांची फसवणूक झाली नसती. भविष्यात लोकांचे नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीलाच अशा अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त केले पाहिजे.” महानगरपालिकेचे अधिकारी या संदर्भात अधिक जबाबदारीने लक्ष घालतील, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

Web Title: In the name of redevelopment people are being talked into demolishing houses ganesh naiks warning from thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • BJP
  • Ganesh Naik
  • Thane news

संबंधित बातम्या

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
1

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
2

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Thane News : गणेश विसर्जनाबाबत पालिकेचा मोठा निर्णय; आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले निर्देश
3

Thane News : गणेश विसर्जनाबाबत पालिकेचा मोठा निर्णय; आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले निर्देश

Thane News :  बांबूच्या चटईतून बाप्पाची आरास; पर्यावरणपूरक सजावटीतून दिला संदेश
4

Thane News : बांबूच्या चटईतून बाप्पाची आरास; पर्यावरणपूरक सजावटीतून दिला संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.