Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारांत वाढ’; संजय राऊत यांचा घणाघात

हुकूमशाहीचा पराभव व्हावा. नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नसताना देखील ते उभे राहिले आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. वसंत चव्हाण इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे वाटले नव्हते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2024 | 11:48 AM
'सरकार निर्लज्जपणे आरोपींना पाठीशी घालतंय'; राजकोट घटनेवर संजय राऊत यांचा निशाणा

'सरकार निर्लज्जपणे आरोपींना पाठीशी घालतंय'; राजकोट घटनेवर संजय राऊत यांचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. ‘भाजपकडे सध्या काही काम नाही आहे, भाजप भ्रमिष्ट पक्ष आहे. त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे’, असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर पगारी वर्कर आहेत. त्यांच्या सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत. ज्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत. नुसते आरोप नाहीत तर त्या महिलांनी आत्महत्या केली. त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. पण आता तेच त्यांच्या सरकारमध्ये आहेत. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. यातून तुमचेच मुखवटे गळून पडतील. ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’.

…हा पोलिसावरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला

पुण्यात रविवारी पोलिसावर हल्ला करण्यात आला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘हा पोलिसावरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीत. ते आम्हाला सांगतात की, ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील. पुण्यात सर्वात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेला आहे. पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का? पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत, जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत’.

वसंत चव्हाण इतक्या लवकर सोडून जातील वाटलं नाही

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘हुकूमशाहीचा पराभव व्हावा. नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नसताना देखील ते उभे राहिले आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. वसंत चव्हाण इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे वाटले नव्हते. आम्ही सर्व शिवसेना परिवारत्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला आणि तो जिंकला पण दुर्दैवी आजाराने ग्रस्त झाले त्यांचे निधन झाले’.

Web Title: Increase in violence against women since bjp government came to power says sanjay raut nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार
1

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
2

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.