Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भाजपाने ही अवस्था केव्हाच प्राप्त….; जे. पी. नड्डांनी केलेल्या वक्तव्यावर संघाचे अभ्यासक वसंत काणेंची परखड प्रतिक्रिया

आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. आम्ही आमचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहोत, त्यामुळे स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळतो. जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले होते.

  • By युवराज भगत
Updated On: May 18, 2024 | 06:08 PM
“भाजपाने ही अवस्था केव्हाच प्राप्त….; जे. पी. नड्डांनी केलेल्या वक्तव्यावर संघाचे अभ्यासक वसंत काणेंची परखड प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:
Vasant Kanes Reaction on J. P. Nadda Statement : “भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो”, असे विधान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, भाजपाला आता आरएएसची गरज नसल्याचे म्हटले जात आहे. जे. पी. नड्डा यांच्या या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक वसंत काणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका
“सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळतो. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे”, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले. भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? असे विचारले असता नड्डा म्हणाले, “पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत.
आम्ही राजकीय संघटना आहोत
आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपले काम करतात, आम्ही आमचे काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचे कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवे”, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
वसंत काणे काय म्हणाले?
अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वंयपूर्ण व्हा
“जे. पी. नड्डांचे वक्तव्य कोणत्या संदर्भात हे थोडंसं स्पष्ट होत नाहीये. भाजपाच्या भूमिकेशी सहमत असलेले संघाचे स्वयंसेवकच नव्हे तर अशा ज्या कोणी समाजात व्यक्ती असतील त्यांची मदत त्यांना होत असेल हे बरोबर आहे. त्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केले असेल. पण, संघाची मूळ अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वंयपूर्ण व्हा. स्वतःच्या भरवश्यावर उभे राहा. कोणावरही अवलंबून राहू नका. आणि भाजपाने ही अवस्था केव्हाच प्राप्त केली असेल.
एवढा मोठा राजकीय पक्ष, १० वर्षे सत्तेवर आहे आणि तो स्वंयपूर्ण नाही असे असूच शकत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशी स्थिती असू शकते. प्रारंभीच्या कारणात प्रतिष्ठा, ओळख लागते. त्यादृष्टीने काही सहाय्य संघाचे झालं असू शकेल हे शक्य आहे. त्या व्यतिरिक्त आता ते म्हणतात की आम्ही स्वंयपूर्ण आहोत, याचा अर्थ आम्ही पूर्णपणे उद्दीष्ट गाठलं आहे, आता आम्हाला कोणाचीही गरज नाही. आणि हेच संघालाही अपेक्षित आहे”, असं आरएसएसचे अभ्यासक वसंत काणे म्हणाले.

Web Title: J p nadda said rss is an ideological wing they do their work ideologically we do our work nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • J. P. Nadda
  • Rashtriya Swayamsevak Sangh
  • RSS

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bhiwandi Court:’माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; राहुल गांधींच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?
1

Rahul Gandhi Bhiwandi Court:’माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; राहुल गांधींच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Threat Case:  राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक
2

Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”
3

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.