
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी
काही महाभाग मंडळींनी तर पाणी योजनेच्या पाईपला चार ठिकाणी शेतीत पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आहे. राधानगरी तालुका हा तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो, पण या तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोते पैकी माणेवाडी गावच्या ग्राम प्रशासनाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कडक शब्दात ताकीद द्यावी व गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ओढ्याचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
कोते गावाला तुळशी नदीतून पाणी येते, तेथून माणेवाडी गावाला पाणी आणले जाते, तर नैसर्गिक मिळणारे झऱ्याचे पाणी आटल्याने त्या ठिकाणी ओढ्याचे पाणी आणून पिण्याच्या पाण्यात सोडले आहे हा प्रकार आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे बोलले जात आहे. माणेवाडी गावच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कमकुवत झाल्या आहेत. या पाणीटंचाईवर कहर म्हणून ग्राम प्रशासनाने पेयजल योजनेवर ७ लाख रुपये नुकतेच खर्च केले आहे. तरीसुद्धा अपुरा व दूषित पाणीपुरवठा माणेवाडी गावाला मिळत असल्याने नेमके ७ लाख रुपये गेले कोठे, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
८८ उन्हाळ्याचा पूर्वसंध्येलाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली आहे, तर ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असे दिसते. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करुन गावाला स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन
– प्रकाश केरबा माने, ग्रामस्थ, माणेवाडी