
11 फेब्रुवारी रोजी कर्जत येथून चौक कडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने ईटीका गाडीला धडक दिल्याने त्या अपघात ग्रस्त गाडीचे चालक आणि सोबत असलेले कामगार गंभीर जखमी झाले होते. नेरळ येथे राहणारा रिंकू सिंग आपल्या कामगाराला सोबत घेऊन वांगणी येथून चौक कडे चालला होता.त्यांची एम एच ०५ इ ए ५७१३ इर्टिका जीप घेऊन कर्जत चौक रस्त्याने चौककडे जात होती.वांगणी येथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत आणि पुढे कर्जत चौक रस्त्याने जात असताना पनवेल येथून कर्जत कडे येणारी एसटी गाडी एम एच २० बी एल ३६२५ ही एसटी गाडी रिंकू सिंग यांच्या गाडीवर आदळली. ओव्हरटेक करीत असताना ही एसटी गाडी इर्टिका गाडीवर आदळली होती आणि त्यावेळी अपघात झाला होता.या अपघातात गाडीचे चालक गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले गेले.तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण रिंकू सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचे नातेवाईक यांनी त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले.तेथे रिंकू सिंग यांच्यावर उपचार सुरू होते,मात्र 19 फेब्रुवारी च्या रात्री अपघातानंतर दहाव्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रिंकू सिंग यांचे एकत्र कुटुंब असून या कुटुंबामध्ये आई वडील तीन भाऊ असून त्याला दोन मुली,एक मुलगा आणि पत्नी असा मोठ्या एकत्र परिवारामध्ये राहणारे रिंकू सिंग यांच्यावर मृतदेहावर 20 फेब्रुवारी रोजी नेरळ अंत्यसंस्कार करण्यात आले.कर्जत एसटी आगाराची गाडी क्रमांक एम एच २० बी एल ३६२५ या एसटी गाडीचे चालक एवढा मोठा अपघात होऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई त्या बस चालकावर होताना दिसत नाही. किंवा दहा दिवसात या पेशंटची साधी चौकशी सुद्धा केली नाही. तीव्र वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाचा बळी घेणाऱ्या या एसटी गाडीचे चालक यांच्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.