Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप

कोटी रुपये खर्च करूनही भिवंडीमध्ये संवर्धनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खर्च करूनही देखरेख मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नाहीये.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 17, 2025 | 05:28 PM
तलावाच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च, मात्र देखरेख नाही

तलावाच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च, मात्र देखरेख नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिवंडीतील तलाव आले संकटात
  • भिवंडीची दुरवस्था 
  • कोट्यावधींचा खर्च करूनही देखरेख नाही 
भिवंडीः देशातील सर्वात मोठी यंत्रमाग नगरी म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील तलावांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यापूर्वी शहरात अकरा तलाव अस्तित्वात असताना, आज केवळ पाच तलाव उरले आहेत. त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. गणेश विसर्जनासाठी या तलावांचा वापर होतो. मात्र, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने तलावांच्या पाण्यावर हिरवा तवंग साचला आहे. या तलावांत मोठ्या प्रमाणात कचरा, घाण, प्लास्टिक तसेच तलावांमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 

वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप वाढत आहे. तलाव संवर्धनासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो मात्र देखरेख नसल्याने सर्व ठिकाणी दुरावस्था झाली आहे. वहाळ तलाव, नारपोली तलाव, नसरुल्ला तलाव, भादवाड तलाव, तडाली तलाव हेच अस्तित्वात असलेले तलाव असून इतर सर्व तलाब संपुष्टात आली आहे.

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

अतिक्रमणाचा विळखा

काही विकाणी तर तलाव बुजवून अतिक्रमण झाले असून झोपडपट्टचा, इमारती उभ्या झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी शासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षतेमुळे आता फक्त ५ तलावचे उरली आहेत आणि त्याची देखील दुरावस्था सुरू आहे.

चलावांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती तुटल्या असून, त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. काही ठिकाणी अनधिकृत भराव टाकून तलाव कुजवले जात आहेत. आधी अस्तित्वात असलेल्या अकरा तलावांपैकी पाच ते सहा तलाव अतिक्रमणामुळे नामशेष इगले असून, या जागावर झोपडपट्टचा आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत. महानगरपालिकेने वेळेत कारवाई केली नाही, तर उरलेले पाच तलावही लवकरच नामशेष होतील. 

पाण्याचा तुटवडा आणि दुर्मीळ होत चाललेले नैसर्गिक जलसेत

भिवंडी शहराला दररोज १६२ एमएलडी पाण्याची गरज असताना, केवळ १२० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शहरातील एकमेव बहाळ तलावातून ५ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४२ एमएलडी, तर स्टेम कंपनीकडून ७३ एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहरातील तलाव टिकून राहिले असते, तर पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसती. मात्र, तलावांची योग्य देखभाल न झाल्याने आणि काही तलाव नष्ट झाल्याने शहरातील नैसर्गिक जलस्रोत कमी झाले आहेत.

Thane Crime: भिवंडी हादरली! महिलेचा शिरच्छेद झालेला सापडला मृतदेह, उर्वरित भाग कुठे? नागरिकांमध्ये भीतीची वातावरण

गर्दुल्ले, दारूपार्थ्यांचा अड्डा

बडाळ तलाव शेजारी तब्बल १२.५ कोटी खर्च करून २००५ मध्ये वहाळ उद्यान नागरिकांसाठी तयार करण्यात आले, तलावात बोटिंग सुरु करण्यात आली. सुस्थित असलेलं तलाव व उद्यान आज ते गर्दुल्ले आणि गैरकृत्य करणा-यांचा अड्डा बनले आहे. येथे दारू पाटी, पत्ते खेळणे, प्रेमी युगीळांचे अश्लील चाळे यांसारखे प्रकार होत आहे. तसेच अस्वच्छता यासारखे प्रकार सर्रास घडत आहेत. नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी या समस्येकडे लक्ष वेधले असले, तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती जैसे थे आहे.

महानगरपालिकेने त्वरीत पावले उचलावीत

तलावांचे संवर्धन आणि उद्यानांचे संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात हे सार्वजनिक ठिकाण पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. तसेच, या ठिकाणांसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, तलावांची नियमित स्वच्छता करावी आणि अनधिकृत अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी, नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

 

Web Title: Lack of maintenance in bhiwandi crores of rupees spent but no supervision citizens are outraged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • bhiwandi
  • Bhiwandi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक
1

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
2

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
3

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.