Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

४ हजार ८४९ एकर जमीन परत देणार, ९६३ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळ आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2025 | 05:22 PM
cm devendra fadnavis and mahayuti will farmer give Loan waiver or not

cm devendra fadnavis and mahayuti will farmer give Loan waiver or not

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra government: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी आज (2 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात पहिली बैठक झाली. अवघ्या ३० मिनीटात ही बैठकीमध्ये केवळ ३ निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य खात्याचे मंत्री उपस्थित होते. तसेच संबंधित खात्याचे मंत्रालयीन अधिकारीही उपस्थित होते. राज्यातील एकूण ९६३ शेतकऱ्यांना ४ हजार ८४९ एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला; काय आहे प्रकरण? वाचाच

राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या 4 हजार 949 जमिनी सरकारकडे जमा करण्यात आल्या होत्या. शेतसारा न भरल्याने या जमीनी तहसीलदारांनी शासन निर्णय जमा केला होता. अनेक दिवस हा निर्णय प्रलंबित होता. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी संपूर्ण ९६३ शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करण्याचा निर्णय घेतला. रेडी रेकनर दराच्या २५ टक्के इतकी रक्कम भरून घेऊन ही जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावर केली जाणार आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रलंबित आहे. त्यामुळेच आज मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 200 अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या आकारी पड जमिनी जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत.यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक मांडण्यास मान्यता देण्यात आली. कर थकबाकी किंवा तत्सम थकबाकी न भरल्यामुळे, अशी जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 220 नुसार खरेदी केली जाते आणि जमीन महसूलाच्या स्वरूपात सरकारकडे जमा केली जाते. 12 वर्षांच्या आत रक्कम भरल्यास जमीन कर आणि व्याजाची उर्वरित रक्कम मूळ खातेदारांना हस्तांतरित करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, 12 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशा जमिनी मूळ जमिनीला परत करण्याची तरतूद नव्हती. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 220 अन्वये अशी जमीन वसूल करण्यासाठी आणि प्रचलित बाजार मूल्याच्या 25% वसूल करून मूळ जमीनधारकांना किंवा त्यांच्या वारसांना हस्तांतरित करण्यासाठी तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. असे विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडले जाणार आहे.

संसाराची राखरांगोळी! जास्त बोलते म्हणून नवऱ्याने थेट बायकोचा…; राज्य हादरलं

Web Title: Maharashtra government to return land to farmers if remains unused for 10 yrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला
1

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का
2

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का

Uddhav Thackeray News: ‘मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून’; उद्धव ठाकरेंनी डिवचलं
3

Uddhav Thackeray News: ‘मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून’; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा
4

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.