Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उत्पादनात महाराष्ट्राची भरारी, विक्रमी १३२ लाख टन उत्पादन; साखर आयुक्तांचा दावा

चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2022 | 03:14 PM
साखर उत्पादनात महाराष्ट्राची भरारी, विक्रमी १३२ लाख टन उत्पादन; साखर आयुक्तांचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. अतिरिक्त उत्पादनाशी संबंधित समस्या आणि परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले.

चालू हंगामात राज्यात एक हजार १८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून बहुतांशी भागात अजूनही सुमारे ९० लाख टन उसाचे गाळपासाठी शिल्लक आहे. यामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्राने याआधी २०१९-२० या हंगामात सर्वाधिक १०७ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली होती. यावर्षी ते जवळपास १३२ लाख टनांवर पोहोचले आहे, तर उत्तर प्रदेशात यावर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील विविध कंपन्यांनी १३० ते १४० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनातून ९-१० हजार कोटी मिळविल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.

[read_also content=”भ्रष्टाचारी कार्यपद्धती न अवलंबता ते प्रस्ताव रद्द करा; भाजपची प्रशासकांकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/reject-the-proposal-without-resorting-to-corrupt-practices-bjps-demand-to-administrators-nr-267216.html”]

गाळप हंगाम लांबणार –

साधरणणे राज्यातील ऊस गाळप हंगाम हा १२० ते १४० दिवस किंवा जास्तीत जास्त १४५ दिवसांपर्यंत चालतो. मात्र, यावर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २० कारखान्यांचा गाळप हंगाम १६० दिवसांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ९० लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. ज्यामध्ये एकट्या मराठवाड्यात ६० लाख टन ऊस आहे. ३१ मे पर्यंत मराठवाड्यातील उसाचे गाळप होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, तर सोलापुर जिल्ह्यातील कारखान्यांनी मराठवाड्यातून २० हजार टन ऊस गाळपासाठी उचलल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.

Web Title: Maharashtras record in sugar production record production of 132 lakh tonnes sugar commissioners claim nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 03:14 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • cmomaharashtra
  • narendra modi
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
4

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.