Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईत कबूतरांच्या आहारावर बंदी, प्राणी,पक्षीप्रेमी आक्रमक; मंगल प्रभात लोढाचे आयुक्तांना पत्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने नुकतेच जारी केलेल्या आदेशानुसार, आरोग्यधोका टाळण्यासाठी ही बंदी लागू केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 04, 2025 | 11:07 AM
Mangal Prabhat Lodha's letter to the Commissioner regarding the ban on feeding pigeons in Mumbai

Mangal Prabhat Lodha's letter to the Commissioner regarding the ban on feeding pigeons in Mumbai

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai News: मुंबई शहरात कबुतरांना आहार देण्यावर आता कठोर निर्बंध आणि कायदेशीर कारवाई लागू आहे. मोकळ्या ठिकाणी त्यांना दाणे टाकणाऱ्यांना ₹५०० दंड ठोठावला जाणार असून कोर्टाने FIR दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राणी प्रेमी आणि पक्षीप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले.

लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या पत्रात काही सुचनादेखील मांडल्या आहेत.

Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

  • बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा.
  • दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा.
  • जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पशुप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा.
    असे लोढा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महानगरपालिका ही एक जबाबदार संस्था असून ती या विषयाकडे मानवी व संवेदनशील दृष्टिकोनातून पाहील, अशी अपेक्षा आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने नुकतेच जारी केलेल्या आदेशानुसार, आरोग्यधोका टाळण्यासाठी ही बंदी लागू केली असून, उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या आदेशानुसार दादरमधील प्रसिद्ध कबूतरखानाही बंद करण्यात आला आहे. तेथे ताडपत्री टाकून कबुतरांना खाद्य देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र या बंदीला काही नागरिक आणि पक्षीप्रेमींकडून विरोध होत आहे.

Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली 

कबूतरखाने सुरू ठेवावेत, या मागणीसाठी जैन समाजाने रॅली काढली. तसेच, राज्याचे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जनभावनेची आणि साधू-संत, पक्षीप्रेमींच्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेण्याचीही मागणी केली आहे. आरे कॉलनी, बीकेसी, रेस कोर्स अशा मोकळ्या जागांचा पर्याय सुचवत त्यांनी सुवर्णमध्य काढण्याचे आवाहनही केलं आहे.

Web Title: Mangal prabhat lodhas letter to the commissioner regarding the ban on feeding pigeons in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी
1

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

नवराष्ट्रच्या बातमीचा Impact: मंदिर वाचवण्यासाठी रस्त्यावर हिंदू संघटना; काँग्रेस-शिवसेना एकवटली, भाजपविरोधी वातावरण
2

नवराष्ट्रच्या बातमीचा Impact: मंदिर वाचवण्यासाठी रस्त्यावर हिंदू संघटना; काँग्रेस-शिवसेना एकवटली, भाजपविरोधी वातावरण

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका
3

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी ! राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; राज्य तंत्रज्ञान विभागाचा धाडसी निर्णय
4

मोठी बातमी ! राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; राज्य तंत्रज्ञान विभागाचा धाडसी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.