
फोटो सौजन्य AI
व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही निवडणुकीच्या आखाड्यात पडा असे मी नेहमी समाजाला सांगतो . पण मी सुरुवातीपासूनच गरीब मराठ्यांसाठी आरक्षणासाठी मागत आलो आहे. त्या मागणीवर मी कायम असल्याचे मत देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मी कोणाचा मिंधा नाही महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो माझ्या गरीब मराठा समाजासाठी मी लढतो. मला मित्रत्वाची गरज नाही मला समाजहीत महत्वाचं आहे. समाजाची लेकरबाळ मला अधिकारी करायचेत असेही जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत . राज्यातील जनतेचे प्रमाणपत्र जर तुम्ही रद्द करत असाल तर मला मित्रापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे . आम्ही तुमची तारीफ केली म्हणून तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करत आहात का ? आमच्या पोरांचे मुडदे पाडणार का ? असा सवाल सुद्धा केला .
मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांचे कौतुक केले . लाड यांना समाजाच्या मुलांचे भले व्हावं असे वाटत आहे . त्यासाठी त्यांची धावपळ सुरु असते पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यांना हवा तसा पाठिंबा मिळत नाही . प्रसाद लाड यांच्या मित्रालाही त्यांनी बिगरमिशीचा म्हणत टोला लगावला . प्रसाद लाड यांच्यावर टीका करणार्यांना आम्ही मोजत नाही , कोलतो असे विधान केले . या विधानाचा रोख लक्ष्मण हाके यांच्यावर होता . तर आम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्लॅन कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही ते पुढे म्हणाले .