Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांचा सुफडा साफ होणार’; मराठा नेते मनोज जरांगे पाटलांचा इशारा

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीवर त्याचा मोठा फरक पडणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण न दिल्यास निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाला तयार राहण्याचे आणि घेतलेला निर्णयामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 13, 2024 | 11:08 AM
manoj jaranage patil

manoj jaranage patil

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणावरुन राजकारण रंगले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून नेत्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रमाण वाढले आहे. राजकीय नेत्यांनी भूमिका जाहीर करण्याची मागणी मराठा बांधव करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता ऱॅलीचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. मराठवाड्यामध्ये पहिली शांतता रॅली पार पडल्यानंतर दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरु केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूका लढवण्याचा निर्णय ठाम असल्याचे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूका लढण्याच्या निर्णयावर ठाम असून आरक्षण मिळाले नाही तर सर्व जागा लढवणार असल्याचे सांगतिले आहे. जरांगे पाटील म्हणाले, “महाराष्ट्रामधून 17 ते 18 टक्के मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे. मग आपण तेथे उमेदवार निवडून आणू शकलो नाहीत, तरी तेथील 19 जागांचा कार्यक्रम केला म्हणून समजा. म्हणजे पाडलेच म्हणून समजा. आपण तेथेही शोध मोहीम सुरु केलेली आहे. आता कोकणातील काही भाग अजून बाकी राहिला आहे, तर मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तीनही विभाग एका बाजूला आहेत. या तीनही विभागात यांचा सुपडा साफ होणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा

आगामी विधानसभा निवडणूकांसाठी जरांगे पाटील यांनी त्यांचे नियोजन सुरु देखील केले आहे. इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत असून त्यांची मुलाखत स्वतः जरांगे पाटील घेणार आहेत. निवडणूकांबाबतत जरांगे पाटील यांची तयारी सुरु झाली असून ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांची आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास आरक्षणामध्ये आल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. ते म्हणाले, मराठा समजाला आरक्षण दिले नाही तर विधानसभा लढणार.  मराठा समाजाची कसोटी लागलेली आहे. याबाबत 29 ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा”, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

Web Title: Manoj jarange says bjp will be lost in west maharashtra nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Legislative Assembly election 2024
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.