Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतर ‘सायबर वॉर’; 23 एप्रिलनंतर भारतावर झाले तब्बल 10 लाख हल्ले

सध्या होणारे हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य-पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया येथून होत आहेत. हे सर्व हॅकिंग ग्रुप्स स्वतःला इस्लामिक संघटना असल्याचे सांगतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2025 | 03:07 PM
28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना

28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखी नव्या हल्ल्यांचे सावट उभे राहिले आहे. या हल्ल्याला सायबर वॉरफेअर (सायबर युद्ध) असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने ‘इकोज ऑफ पहलगाम’ या नावाने एक अहवाल तयार केला आहे. ज्यामध्ये 23 एप्रिलनंतर भारतावर जवळपास 10 लाख सायबर हल्ले झाल्याचे उघड झाले आहे.

सध्या होणारे हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य-पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया येथून होत आहेत. हे सर्व हॅकिंग ग्रुप्स स्वतःला इस्लामिक संघटना असल्याचे सांगतात. यामध्ये टीम इन्सेन पीके हा पाकिस्तानी एपीटी (अॅडव्हान्स प्रेसिस्टन्ट थ्रेट) ग्रुप सर्वाधिक सक्रिय आहे. या ग्रुपने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक वेल्फेअर आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत. या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाईट डिफेसमेंट, सीएमएस एक्प्लॉइटेंशन आणि कमांड अँड कंट्रोल अॅटॅक्स यांचा समावेश आहे.

रेल्वे, बँकिंग, सरकारी पोर्टल यंत्रणा धोक्यात असल्याचेही समोर आले आहे. हे सर्व सायबर हल्ले 26 एप्रिलपासून सुरू झाले असून, काही हल्ले यशस्वी देखील ठरले आहेत. महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखले असले तरी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले की, रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टल्ससारख्या महत्त्वाच्या यंत्राणांवर धोका निर्माण झाला. अनेक ठिकाणी सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे हे हल्ले यशस्वी झाले.

22 एप्रिलला झाला होता हल्ला

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरवून सोडले. या भयानक घटनेत 26 नागरिकांचा बळी गेला असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारताने या हल्ल्याला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले आहे, तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावत भारतावर संघर्ष उकळण्याचा आरोप केला आहे.

Web Title: Many cyber war after pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.