Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणावरून अजून वाद पेटणार! चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितल तर राणे म्हणाले- ‘ओबीसी नाही तर EWS…’

मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 31, 2025 | 04:35 PM
मराठा आरक्षणावरून अजून वाद पेटणार! चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितल तर राणे म्हणाले- ‘ओबीसी नाही तर EWS…’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणावर बसले आहेत. त्यांनी १ सप्टेंबरपासून पाणीही सोडण्याचा निर्णय घेतला होता, पंरतु, त्यांच्या या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ घ्यायला हवा. या कोट्यातील आरक्षणाचे प्रमाण वाढवण्यावरही सरकार विचार करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी नाही, तर EWS आरक्षण घ्या – राणे

मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्या ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला विरोध केला. ते म्हणाले की, जर जरांगे यांनी आपली मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित ठेवली, तर सरकार त्यावर विचार करू शकते. मात्र, ते पुढे म्हणाले की कोकणात मराठा आणि कुणबी यांची ओळख वेगळी आहे आणि ते सध्याच्या परिस्थितीत समाधानी आहेत. माझ्या आणि इतर भागातील मराठा समाजाचे लोक ओबीसीचा लाभ मिळवण्यासाठी कुणबी म्हणून ओळख स्वीकारायला तयार होणार नाहीत.

याऐवजी, राज्य सरकारने याआधीच एक कायदा केला आहे, ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला (EWS) शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण आणि इतर आर्थिक मदत दिली जाते. जर हे आरक्षण वाढवण्याची मागणी असेल, तर सरकारसोबत यावर चर्चा केली जाऊ शकते, असेही राणेंनी सांगितले.

हे देखील वाचा: Manoj Jarage Patil: ‘उद्यापासुन कडक उपोषन करणार, पाणी बंद करणार’, मनोज जरांगे पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय

मराठ्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला नाही – पाटील

मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, मराठा समाजाला कधीही अस्पृश्यतेचा सामना करावा लागला नाही आणि ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत. मात्र, वर्षांनुवर्षे जमिनींचे तुकडे झाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी झाल्यावर खरी समस्या सुरू झाली आणि मराठा कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, जसे की महागडे वैद्यकीय शिक्षण, परवडू शकत नाहीत.

ते पुढे म्हणाले की, यामुळेच ते शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहेत. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) जे आरक्षण दिले आहे, त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. हे आरक्षण मराठा समाजाला एक चांगला पर्याय देऊ शकते, असे पाटीलांनी सुचवले.

EWS म्हणजे काय?

केंद्र सरकारने २०१९ मध्ये EWS म्हणजे Economically Weaker Section (आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग) ची सुरुवात केली होती. या अंतर्गत सर्वसामान्य वर्गातील लोकांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते. यासाठी संविधानात १०३ वी दुरुस्ती करण्यात आली होती. या आरक्षणाचा लाभ अशा कुटुंबांना मिळतो, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे आमदार रोहित पवार यांच्यावर जरांगे यांच्या आंदोलनासाठी निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेते केशव उपाध्याय यांनी महाविकास आघाडीतील (एमव्हीए) काही पक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून “फूट पाडा आणि राज्य करा” असे राजकारण करत असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Maratha reservation controversy rane patil on ews quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Manoj Jarang patil
  • Maratha Arakshan
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा
1

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा

Eknath Shinde: “चळवळीला यश, सरकारने सकारात्मक…” जरांगेनी उपोषण सोडल्यानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
2

Eknath Shinde: “चळवळीला यश, सरकारने सकारात्मक…” जरांगेनी उपोषण सोडल्यानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?
3

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
4

Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.