Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मराठा आरक्षण टिकणार की जाणार, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात आज नक्की काय घडलं?

महाराष्ट्र सरकारने एसईबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण देण्यात आले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 11, 2025 | 08:17 PM
मराठा आरक्षण मिळणार की स्टे आणणार; मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय घडलं?

मराठा आरक्षण मिळणार की स्टे आणणार; मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र सरकारने एसईबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले होते. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात हे आरक्षण देण्यात आले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी विशेष खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पूर्ण खंडपीठाने मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर अंतिम सुनावणीस सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींना केरळ उच्च न्यायालयाकडून समन्स, नक्की काय आहे प्रकरण?

काय घडलं सुनावणीत?

मराठा आरक्षणाच्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मे महिन्यात सुनावणी घ्यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याआधीच दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी विशेष सुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अंतिम सुनावणी होईपर्यंत या प्रकरणाला स्थगिती मिळावी. तर सरकारी वकिलांनी युक्तीवाद करत , सर्वोच्च न्यायालयाने आधीच अंतरिम दिलासा दिला आहे, त्यामुळे आता अंतिम सुनावणी थेट सुरू करावी, अशी विनंती केली.

“मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा दिलेला आहे, त्यामुळे पुन्हा अंतरिम मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी अंतिम सुनावणी सुरू करावी, अशी विनंती राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी केली.

त्यावर न्यायालयाने विरोधी पक्षातील वकिलांकडे विचारणा केली की, एवढ्या सर्व याचिकांमध्ये विरोधाचे प्रतिनिधित्व कोण करणार? त्यावर वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सांगितले की, “प्रत्येक याचिकाकर्त्यांचे मुद्दे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे.”

न्यायमूर्ती घुगे यांनी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आणि १९ जुलै रोजी दिवसभर घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर १९ जुलै रोजी पुढील तारखांची घोषणा केली जाईल.

Justice Yashwant Verma : न्यायमूर्ती वर्माविरोधात महाभियोग, पावसाळी अधिवेशनात होणार कारवाई

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बुधवारीच्या सुनावणीत मराठा आरक्षणावर कोणतीही अंतरिम स्थगिती लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी सध्या एसईबीसी (SEBC) आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा राहणार आहे.मराठा आरक्षणाच्या वैधतेवर अंतिम निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयात सुनावणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या प्रकरणावर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Maratha reservation hearing in bombay high court latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
4

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.