Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा अजब कारभार; रहिवाशांना बेघर करून बारला संरक्षण

धोकादायक ठरवून इमारत पाडली, रहिवासी बेघर झाले पण बार सुरक्षित आहेत. रिपेअरिंग’च्या नावाखाली नव्याने बार उभारणी होणार असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2025 | 05:33 PM
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा अजब कारभार; रहिवाशांना बेघर करून बारला संरक्षण

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा अजब कारभार; रहिवाशांना बेघर करून बारला संरक्षण

Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका जुन्या इमारतीला धोकादायक घोषित करून पालिकेने ती पाडली. या इमारतीत राहणारे अनेक रहिवासी अक्षरशः रस्त्यावर आले. मात्र, या इमारतीत असलेला बार मात्र पालिकेच्या विशेष कृपेने सुरक्षित राहिला. इतकेच नव्हे, तर ‘रिपेअरिंग परमिशन’ च्या नावाखाली हा बार नव्याने बांधण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कारभाराची दुटप्पी आणि संशयास्पद बाजू पुन्हा एकदा उघड झाली आहे. मिरा रोड पूर्वेतील मीरा श्रीराम सहकारी गृहनिर्माण संस्था लि., मिरा रोड येथील इमारत धोकादायक म्हणून पालिकेने जमीनदोस्त केली. या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांना अक्षरशः रस्त्यावर आणून सोडले. मात्र, या इमारतीत असलेला बार मात्र पालिकेच्या विशेष कृपेचा धनी ठरला. इमारत पाडली गेली, पण बार सुरक्षित राहिला. एवढेच नव्हे तर रिपेअरिंग परमिशनच्या नावाखाली आता हा बार नव्याने उभारला जात असल्याची धक्कादायक बाब स्थानिक रहिवाश्यांनी निदर्शनास आणली आहे.हे प्रकरण म्हणजे पालिकेच्या कामकाजातील गंभीर विसंगतीचं जिवंत उदाहरण आहे.

जर इमारत धोकादायक होती, तर त्या इमारतीतील बार देखील धोकादायक ठरला असायला हवा. पण इथे मात्र नेमकी उलटी भूमिका घेतली गेली. राहणारे नागरिक बेघर झाले, पण मद्य विकणारा बार मात्र विशेष संरक्षण मिळवून सुखरूप राहिला. एवढेच नाही, तर इमारत पाडल्यानंतर रिपेअरिंगच्या नावाखाली त्याच जागी बार पुन्हा नव्याने उभा राहत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
गमतीची बाब म्हणजे, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काही दिवसांपूर्वी काशिमिरा भागातील हायवे लगत असलेल्या बारांवर तोडक कारवाई केली. पण त्याच वेळेस मिरा रोडमधील या बारला मात्र विशेष सवलतीसह संरक्षण देण्यात आल्याचे दिसून येते. यामुळे पालिका दुटप्पी वागणूक देतेय का? असा सवाल निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवाशांनी केलेल्या आरोपांनुसार, बारसाठी ज्या परवानग्या आवश्यक आहेत त्या सर्व रिपेअरिंग परमिशनच्या आड लपवल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात जुने काहीच शिल्लक नाही, पूर्णपणे नवी रचना उभारली जात आहे. मग हे नेमके रिपेअरिंग कसे? हा प्रश्न थेट महानगरपालिका प्रशासनाला विचारला जात आहे. रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त करून, तिथे पुन्हा बारच उभारायचा असेल तर त्यामागचे हेतू काय? हे लोकशाहीत चालेल का? असे प्रश्न संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. त्यांचा आरोप आहे की, महानगरपालिका फक्त पैसेवाल्यांचेच ऐकते आणि सामान्य माणूस बेघर झाला तरी त्यांना फरक पडत नाही. बारमालक आणि व्यावसायिकांचे हितसंबंध जपण्यासाठी पालिकेने या प्रकरणाकडे हेतूपुरस्सर डोळेझाक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.

Web Title: Mira bhayander municipal corporations strange administration protecting bars by displacing residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Meera Bhayander News
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
1

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
2

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा
3

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप
4

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.