शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह दमदार कामगिरी करत राज्यस्तरासाठी मजल मारली.
उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे भावना घाणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाणेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांवर (Sillod, Paithan, Gangapur, Khultabad, Vaijapur, Kannad, Phulambri N.P.) आपला झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा सध्याचे राजकीय समीकरण बदलले.
नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आहेत. नवी मुंबई मनपाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल असल्याने पालिकेची प्रशंसा केली जात आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २४ सप्टेंबर रोजी उत्तन, पाली, चौक, तारोडी आणि डोंगरी या पाच गावांचा प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) जाहीर केला.
दिवळी म्हटली की रोषणाई आलीच मात्र त्याचबरोबर जोडले जातात ते म्हणजे फटाके. नवी मुंबईच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात फाटके विक्री होत असून रस्यांबाबतच्या कायद्यांचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने शेतीचे, घरादारांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी उभा संसार पाण्याखाली गेल्याने ती मदत तुटपुंजी ठरण्याची शक्यता आहे.
नवरात्रीच्या भंडाऱ्यात 13 वर्षाचा मुलगा जेवण करायला गेला होता. त्यावेळी बाजूला असलेले नाल्याचे झाकण उघडे होते. त्याचवेळी नजरचुकीमुळे अपघात झाला आणि हा मुगला नाल्यात पडला.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाने जसा वेग घेतला, तसं विविध प्रकल्प विमानतळाच्या आसपासच्या परीसरात उभारण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुढील २० वर्षांचे या परिसराचे नियोजन केले आहे.
वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. गेले कित्येक दिवस या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांना आणि प्रवाशांना आता यातून दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.