महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रचारात विकासाचा अजेंडा मागे पडत चालला असून प्रचाराची दिशा थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेकडे वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रीना तोरणे, दीपक मेवानी, सविता आसवानी आणि काळूराम पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
राज्यामध्ये पुणे महापालिकेसह 26 पालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून पालिका अधिकाऱ्यांनी देखील आढावा बैठक घेतली.
नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा रणसंग्राम राज्यभरात सुरु आहे. या निवडणूकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरशीची लढत सुरु असताना आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, 'कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शहरवासीयांची फसवणूक झाली असून, येत्या निवडणुकीत मतदार त्याचा बदला घेतील,' असा घणाघात केला आहे.
सांगली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई चांगलेच गरजले आहेत. भाजपच्या मनमानी कारभाराला प्रत्युत्तर देत योग्य मान मिळाला तरच लढू असे आव्हान दिले आहे
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज घोषणा झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह दमदार कामगिरी करत राज्यस्तरासाठी मजल मारली.
उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे भावना घाणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाणेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांवर (Sillod, Paithan, Gangapur, Khultabad, Vaijapur, Kannad, Phulambri N.P.) आपला झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीपेक्षा सध्याचे राजकीय समीकरण बदलले.
नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आहेत. नवी मुंबई मनपाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल असल्याने पालिकेची प्रशंसा केली जात आहे.