Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत स्तरावर आरोप-प्रत्यारोप

  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रचारात विकासाचा अजेंडा मागे पडत चालला असून प्रचाराची दिशा थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेकडे वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 06, 2026 | 12:57 PM
Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत स्तरावर आरोप-प्रत्यारोप
Follow Us
Close
Follow Us:
  • शहराच्या विकासाचा अजेंडा गायब,
  • निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली
  • व्यक्तिगत स्तरावर आरोप-प्रत्यारोप
कोल्हापूर/ राजेंद्र पाटील :  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रचारात विकासाचा अजेंडा मागे पडत चालला असून प्रचाराची दिशा थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेकडे वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शहराच्या भविष्यासंदर्भातील धोरणात्मक चर्चा, मूलभूत सुविधांचे आराखडे आणि नागरी विकासाचे मुद्दे बाजूला सारून राष्ट्रीय पक्षांचे नेतेमंडळी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच अधिक धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराची पातळी घसरली की काय, असा सवाल सुरुवातीलाच मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार पायाला भिंगरी लावून आपापल्या प्रभागांमध्ये प्रचार करत आहेत. घराघरांत भेटी, कार्यकर्त्यांच्या फळ्या, झेंडे आणि घोषणाबाजी आणि हलगीच्या ठेक्यात परिसर गजबजलेला असला तरी मतदारांशी होणाऱ्या संवादात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसते.
रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, वाहतूक कोंडी अशा मूलभूत प्रश्नांवर ठोस मांडणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र प्रचारातील हे मुद्दे दुय्यम ठरत आहेत.राज्य पातळीवरील पक्षांचे नेते प्रचारासाठी शहरात उतरल्यावर हा कल अधिक ठळक होत आहे. प्रचारसभांमध्ये शहराच्या विकासावर भाष्य करण्याऐवजी विरोधकांवर टीका, जुन्या वादांना उजाळा आणि वैयक्तिक आरोपांची सरबत्ती केली.

जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा धोरणात्मक पातळीवर न राहता वैयक्तिक स्वरूप धारण करत असून त्याचे पडसाद थेट स्थानिक राजकारणात उमटताना दिसत आहेत. एकूणच, या महापालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा दुय्यम ठरून व्यक्तिगत टीका आणि राजकीय आरोपांचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे. अंतिम निकाल काय लागतो, हे मतदानानंतर स्पष्ट होईल, मात्र या निवडणुकीने प्रचाराची पातळी, विकासाविषयीची राजकीय बांधिलकी राजकीय संस्कृती आणि शहराच्या यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विकासाचा ठोस आराखडा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे प्रचारात रंगत
वाढली असली तरी शहराच्या दीर्घकालीन नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवरची चर्चा मात्र दुय्यम ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Vilasrao Deshmukh : रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद सोडली अर्धवट; विलासराव देशमुखांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगी जीवनावर टीका

नेत्याच्या टिप्पणीचा फटका थेट उमेदवारानाही बसता आहे. वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्तिगत पातळीवर टीका होत असल्याने प्रभागातील काही उमेदवार देखील मर्यादा ओलांडत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगी जीवनावर टीका करत असल्याचे आरोप होत आहेत. काही ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करून अपप्रचार, अफवा आणि टीका-टिप्पणी केली जात असून प्रचार अधिकच कटु होत बालला आहे. तक्रारचा होत नसल्याने कारवाईची नोंदच कुठेच होत नाही.

पाच वर्षांत शहरासाठी नेमके काय करणार ?

निवडणूक म्हणजे शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया असते, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र वैयक्तिक आरोपाचे राजकारण पुढे येत असल्याने मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. पुढील पाच वर्षात शहरासाठी नेमके काय करणार, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत असला तरी त्याची ठोस उत्तरे अजूनही कुठेच मिळत नाहीत.

अखेर जेजुरीच्या कारभाऱ्यांनी हाती घेतला पालिकेचा पदभार; विकासकार्याचे नवे पर्व सुरु

Web Title: Maharashtra politics municipal elections in kolhapur leaders exchange accusations over development work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • kolhapur news
  • maharashtra poliotics
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
1

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
2

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
3

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
4

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.