Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे

मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन येण्यासाठी किती खोके संजय राऊतांनी घेतले हे माहिती आहे. ठाकरे आणि राऊत यांचा उदरनिर्वाह खोक्यांवर चालतो, असा हल्लाबोल देखील यावेळी नितेश राणे यांनी केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2024 | 02:33 PM
मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे

मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे

Follow Us
Close
Follow Us:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हातात आहे. आता मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत १० जनपदवर आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे त्यांना आदेश पाळावे लागतात, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

हेदेखील वाचा- नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात करणार प्रवेश

ते म्हणाले की, मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हातात आहे. पण यापूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आदेश ठाकरे गटाला पाळावे लागत आहेत आणि त्यांचे आदेश येतील तसे मुंडके हलवतात अशी दयनीय परिस्थिती उबाठा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. दिल्लीतीतून एका नेत्याने महाविकास आघाडीत राहायचे नसेल तर २८८ जागा स्वतंत्रपणे उबाठा पक्ष म्हणून लढवाव्यात असा सल्ला दिलेला आहे. तरी सुद्धा उद्धव ठाकरे या आघाडीच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे भांडुप मध्ये बसून संजय राऊत यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी दिल्लीत त्यांचा आवाज म्याऊ ..म्याऊ ..असाच येणार.

कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला ते म्हणाले, नागपूरमधील काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला आहे. मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे खेचून आणू असा इशारा दिलेला आहे. हे सर्व पाहता उद्धव ठाकरे आणि उबाठा पक्ष यांची महाविकास आघाडीत दमडीची किंमत राहिलेली नाही. तुमच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री म्हणून तुमचे किती बॅनर लावले, कालांतराने बायको, मुले, मिलिंद नार्वेकर यांचे सुद्धा बॅनर लावले तरी काँग्रेस आणि तुतारी वाले उद्धव ठाकरे यांची लायकी काढण्याचे थांबणार नाही. आणि मुख्यमंत्रीपद तर तुम्हाला कधी देणार नाही असा पुनरुचारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.

हेदेखील वाचा- सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल

मातोश्री आणि उबाठा पक्ष ही पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. त्यामुळे वरून सरदेसाई सर्च जागेवरून आमदारकी लढणार आहे. उद्या पाकिस्तान, बांगलादेश,अमेरिका मधूनही तो लढेल. महायुतीचे हिंदुत्ववादीचेच सरकार येणार आहे. मध्यप्रदेशात भाजपचे राज्य आहे. त्याठिकाणी टीका करता तसे हिंमत असेल तर पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे सरकार आहे. तेथे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे हल्ला करून लोकांचे प्राण दिवसा घेतले जात आहे, अशी उपरोधिक टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

हिम्मत असेल तर ममता बॅनर्जींचा राजीनामा संजय राऊत यांनी मागावा असे आव्हान सुद्धा यावेळी नितेश राणे यांनी केले. खोके आणि कंटेनर घेऊन आयुष्य घालवणार यांनी महायुती सरकारवर टीका करू नये. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन येण्यासाठी किती खोके संजय राऊतांनी घेतले आणि किती कंटेनर घेतले त्या पैशातून कुठे जमिनी घेतल्या हे सर्व ज्ञात आहे. ठाकरे आणि राऊत यांचा उदरनिर्वाह खोक्यांवर चालतो अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.

Web Title: Mla nitesh rane says matoshree and uddhav thackerays shivsena is controlled by delhi high commands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Congress
  • Nitesh Rane
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
2

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
3

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
4

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.