'एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली'; शिवसेनेनेही दिला इशारा
Mumbai News : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी भाजपशी मैत्रीचे संबंध असूनही एकनाथ शिंदे यांच्या नकार घंटेवरमुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आवळण्यात आला. मनसेच्या बैठकीतच नवा खुलासा झाल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे निवडणुकीआधी आमने-सामने आले आहेत.
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? स्वत: च दिलं उत्तर, पंकजा मुंडेंनीही दिली माहिती
राज ठाकरे यांनी मात्र जे झालं, ते विसरा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश दिला आहे.
लोकसभेपाठोपाठ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार अशी जोरदार चर्चा झाल्या. राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीचा प्रचारही केला होता. मात्र अद्यापही मनसेची महायुतीत एन्ट्री झालेली नाही. अमित ठाकरे यांच्याविरोधातही शिंदेंनी उमेदवार दिला होता. दरम्यान मनसेचा महायुतीतील सहभाग फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच होऊ शकला नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. मनसेनं लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी धनुष्यबाण चिन्हाची ऑफर देण्यात आली होती. ती ऑफर राज ठाकरे यांनी धुडकवली होती. मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती होऊ शकली नाही, असा दावा देखील करण्यात आला.
दरम्यान आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या दीड तास बैठकीत महापालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी महायुतीसोबत जायचं की एकला चलोची भूमीका घ्यायची यावरही चर्चा झाली. तर याबाबत एक कमिटी तयार करण्यावर एक मत झाले असून या कमिटीशी युती करायच्या वेळी चर्चा केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण आता याच मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण गरम झालं असून शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याने मनसेला थेट इशारा दिला आहे.
मनसेच्या नेत्यांच्या आरोपांनंतर शिवसेना नेते आमदार योगेश कदम यांनी मनसे नेत्यांच्या आरोपावरून थेट इशारा दिला आहे. शिंदे यांना दोष देणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही. विधानसभेत उलट मनसेमुळेच आमचे दहा आमदार पडले आहेत, दावा देखील कदम यांनी केला आहे.