
गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
Mumbai News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दल सज्ज झाले असून गेले दोन-तीन दिवस उच्च अधिकाऱ्यांपासून कर्मचारी तयारीला लागले आहे. कुठेही काही उणीव राहू नये याची काळजी घेतली जात आहे. मनपा, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्याशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच परिमंडळ पातळीवर त्या त्या परिसरातील सार्वजनिक मंडळांशी समन्वय साधला जात आहे. दरम्यान, दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी सुमारे ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात तैनात असणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी गणपती उत्सव एक असून मुंबईत सार्वजनिक गणपती दर्शन आणि आरास पाहण्यासाठी भक्तीचा सागर उसळत असतो. यावेळी खरी कसोटी मुंबई पोलिसांची लागते.(फोटो सौजन्य – AI)
टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा; कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना धार्मिक तेढ होऊ न देणे, दंगल रोखणे अशा घटनांसोबतच दहशतवादी आणि देश विघातक घटकांवर करडी नजर ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागते. मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचे सर्व विभाग खासकरून कायदा सुव्यवस्था प्रशासन, दहशतवादविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभाग या सर्वांना अलर्ट राहावे लागते. यात थेट नागरिकांशी संबंध असणाऱ्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. गणपती उत्सव सुरू झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत २४ तास ऑन ड्युटी राहावे लागते.
सुरक्षा लक्षात घेता दोनच दिवसांपूर्वी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर अशा उपकरणांवर १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान पूर्णतः बंदी घातली आहे. दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत.विसर्जनाच्या दिवशी सुमारे ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, सोबत तटरक्षक दल, १६ प्लाटून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तसेच पाच केंद्रीय राखीव तुकड्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.शिवाय दंगलरोधी दल वाहन, महिला पोलिस विशेष पथक तैनात असणार आहे. ही प्राथमिक माहिती असून गरजेनुसार यात बदल केला जाऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता
शहरात यंदा साडेसहा हजाराच्या आसपास छोटी-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे, तर पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. भुलेश्वर आणि शीतल तलाव कुर्ला या ठिकाणी उंच मूर्ती आगमन मिरवणुकीत अपघात घडले होते. याला कारण खराब रस्ते असल्याचे संगितले जात आहे. सुदैवाने सर्वांनी शांतता राखत प्रसंगाला सामोरे गेले, मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उंच मूर्तीशी संबंधित मंडळे आणि मनपाशी समन्वय साधण्यात आला आहे. शहरात जागोजागी सीसीटीव्हीचे जाळे असले तरी संशयास्पद ठिकाणी संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक एआय टेक्नॉलॉजीचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.