Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर टोल नाका लवकरच स्थलांतरित होणार असून, दिवाळीपूर्वी नागरिकांना वाहतूक कोंडीतून आणि टोलमधून मोठा दिलासा मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 09, 2025 | 07:50 PM
दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! (Photo Credit- X)

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका!
  • परिवहन मंत्र्यांनी केली स्थलांतरणाची घोषणा
  • उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे होणारा अनावश्यक इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण थांबवण्यासाठी हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टोल नाका दिवाळीपूर्वी तेथून पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोर असलेल्या नर्सरी जवळ हलवण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🗓 ९ सप्टेंबर २०२५ | 📍मुंबई दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच… pic.twitter.com/skEWsMLXKt — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 9, 2025

15 लाख नागरिकांना मिळणार दिलासा

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “दहिसर टोल नाक्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील सुमारे १५ लाख स्थानिक नागरिक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत होता आणि इंधनाचा विनाकारण अपव्यय होत होता.” यावर तोडगा काढण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतच असलेला हा टोल नाका शहराच्या बाहेर हलवण्याची आग्रही मागणी श्री. सरनाईक यांनी केली होती. या निर्णयामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता जमा; CM फडणवीसांच्या हस्ते वितरित

अशी असेल स्थलांतरणाची प्रक्रिया

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे या दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Dahisar toll plaza to be shifted mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Mumbai News
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य
1

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय
2

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
3

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री
4

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.